ब्लॉग संग्रहण

बुधवार, २९ मे, २०२४

मूर्त का अमूर्त ?

मूर्त का अमूर्त ?

            आपल्या या छोट्याशा आयुष्यात कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटत असतात . काही जण मित्र म्हणून येतात तर काहीजण नातेवाईक म्हणून आयुष्यात येतात.  त्यातील थोडे रसिक असतात तर काही जण अरसिक . ते जसे असतात तसे त्यानां स्विकारावेच लागते . फक्त त्यांची एकदा खरी पात्रता कळाली की त्यांना जवळ किंवा दूर करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते . 
           तर सांगायचे कारण म्हणजे माझा एक नातेवाईक आहे. त्याला कोणत्याच विषयाची आवड नाही . चित्रकला , शिल्पकला , नाटक , सिनेमा , वाचन , लिखाण किंवा इतर कोणत्याही कलांशी त्याचे सोयरेसुतक नसते . त्याचे कारण विचारले की तो म्हणतो मी म्हणजे सामान्य माणूस . सरकारी नोकरी मिळाली होती , ती इमानेइतबारे केली त्यामूळे कशाची आवडच निर्माण झाली नाही असे त्याचे उत्तर असते . आणि कोणतीही कला समजून घेण्याचे तो शिताफीने टाळतो पण अनेक गोष्टींवर वादविवाद मात्र नक्की करतो .
            एकदा माझे एक चित्र पाहून हे  मूर्त आहे का अमूर्त ? असा सतत प्रश्नांचा भडिमार त्याने सुरु केला होता . आज त्याच एका चित्राची गोष्ट थोडी विस्ताराने सर्वानां सांगतोय .
           चित्रकलेत जलरंग हे माध्यम बऱ्याच जणानां अवघड वाटते कारण त्यात चुका दुरस्त करता येत नाहीत .पण मला मात्र या माध्यमाचे हेच वैशिष्ट्य महत्वाचे वाटते व ते आव्हानच मला नेहमी नवे चित्र काढण्यास प्रेरीत करते . भारतात जलरंगातील चित्र काढण्याचा कागद 22 इंच बाय 30 इंच आकाराचा असतो त्यापेक्षा मोठा पेपरसाईज मिळत नाही . त्यासाठी मी फ्रान्सचा आर्चेस नावाचा अॅसिड फ्री पेपर वापरतो . तो 45" इंचाच्या रोलमध्ये मिळतो . हवा त्या साईजमध्ये कट करून वापरता येतो . असाच एक 
45" x 81" आकाराचा मोठा पेपरचा तुकडा माझ्याकडे शिल्लक उरला होता .
            या कागदावर मी पूर्वतयारी न करता सहजपणे चित्र काढण्यास सुरूवात केली . संपूर्ण पेपर भिजवला आणि आकाशाची पार्श्वभूमी पूर्ण केली . मला पाचगणीचे टेबललॅन्डचे पठार व सिडने पॉईंटचा परिसर आठवत होता त्यामुळे ते ठरवून मी दृश्य रंगवायला सुरुवात केली आणि अचानक मनात कोकणातील हर्णे बंदराच्या परिसरातील एक वेगळीच  दृश्यमालीका मला आठवू लागली . एकदा कोकणात रात्री उशीरा समुद्रकिनारी फिरत होतो . बंदरावर दोन मोठ्या आकाराच्या अक्राळविक्राळ बोटी उभ्या होत्या . त्या नुकत्याच मोठा प्रवास करून मासेमारी करून आल्या होत्या . मग स्थानिक व बाहेरच्या विकत घेणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांची बोलणी व लिलाव सुरु झाले . ज्यांनी लिलाव घेतले त्यांनी ते छोट्या व्यापाऱ्यांना विक्री करण्यास सुरुवात केली . मोठा जल्लोष व उत्साह भरला होता वातावरणात . लगबिगीने कोळीजमातीचे बांधव त्यांच्या कासोटा घातलेल्या बायका डोक्यावर टोपल्या, हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन मासे भरत होते . मोठ्या बोटीने दोरी बांधून छोट्या बोटीत मासे उतरवत होते . बोटीवरच्या इंजिनमूळे रंगीत लाईटी चमकत होत्या , समुद्राच्या लाटा उसळत होत्या त्याचा तो वेगळा नादभरलेला घनगंभीर आवाज मला ऐकू येत होता . एका वेगळ्याच विश्वात मी रममाण झालो होतो. डोळे व मन जणू चित्रपट पाहत असल्यासारखे सगळी दृश्ये स्मृतीपटलावर चित्रित करण्यात व्यस्त झाले होते .
            हे सगळे विचार डोक्यातून कागदावर सहज मुक्तपणे रंगाद्वारे  उमटत होते . आणि हे आकार आपोआप माझ्या कळतनकळतपणे कागदावर दृश्यरूपाने आपआपली जागा पकडत होते. कोळ्यांचा हा जीवनप्रवास मला रंगीत वाटला मग चित्राच्या शेवटी मी छोट्या वेगवेगळ्या लाल , पिवळा , हिरवा , जांभळा , भगवा , काळा , पांढरा ,अशा रंगीबेरंगी तुकड्यांनी रंगवून चित्राचा शेवट पूर्ण केला .
अर्ध्या एक तासात एक वेगळीच कलाकृती दृश्यरूप घेऊन पूर्ण झाली . 
मी Mojarto art.com या वेबसाईडवर ती कलाकृती विक्रीसाठी ठेवली  व इतर कामात विसरूनही गेलो.काही दिवसांनंतर ते चित्र विकले गेले . 
          खूप दिवसानंतर केरळच्या एका अज्ञात माणसाचा फोन आला . ज्याने ते चित्र विकत घेतले होते व आता तो परदेशात स्थायिक झालेला होता. त्याने बऱ्याच प्रयत्नाने  मला शोधून खूप उशीरा रात्री फोन केला.
           कित्येकवर्ष  केरळात समुद्रकिनारी घालवलेले माझे सगळे बालपण ,तरुणपण व म्हातारपण मला त्या चित्रात दिसले . खूप खूप आनंद झाला .

            ते चित्र मूर्त आहे की अमूर्त ? हा प्रश्नच मला पडला नाही .

            " तुमचे हृदयापासून काढलेले चित्र माझ्या हृदयापर्यंत पोहचले " .

आणि त्याने फोन ठेवला .

चित्र , शिल्प , गायन  , लेखन , कविता , चित्रपट , फोटोग्राफी , नृत्यकला किंवा इतर कोणतीही कला असो . ती कधी भावते ?
           जेव्हा एक कलाकार हृदयापासून कलानिर्मिती करतो त्यावेळीच . त्या कलाकृतीतील आकार , रंग , रेषा ,पोत , विषयाची मांडणी अगदी सहजपणे दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्यंत  पोहचते , ती कलाकृती मनातल्या भावभावनांना , पंचइद्रियांना तृप्त करते . अगदी मन व शरीराच्या सर्व रंध्रारंध्रात  शिरून सगळीकडे चिरंतन शांतता , पूर्ण व तृप्तीचे समाधान निर्माण करते . एक अनामिक बेभान मंत्रमुग्ध वातावरण मनात निर्माण करते .  त्यावेळी भांडत बसायचे नसते . फक्त समजून घेत घेत पंचइंद्रियांनी 
त्या कलाकृतीचा फक्त आस्वाद घ्यायचा असतो .
मग अशावेळी मूर्त का अमूर्त हा प्रश्नच निर्माण होत नाही . 
कारण तो प्रवास असतो
 
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . .
हृदयापासून हृदयापर्यंत . . . . . . . . . . . . 

💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

सुनील काळे
9423966486

सोमवार, २० मे, २०२४

होरमूसजी मामा

  










होरमूसजी मामा 

               पाचगणीला  मराठी मुलींची व छोट्या मुलांची शाळा ज्याठिकाणी होती त्या पोस्टाशेजारच्या शाळेच्या जागेवर आत्ताचे शॉपिंग सेंटर आहे . या शाळेच्या बाजूला लगेचच लागून अतिशय जुन्या पद्धतीची नीटनेटकी सुंदर बगीचा असलेली इमारत आहे , पण त्या इमारतीच्या बाहेर पारशी शिवाय आत प्रवेश करू नये असा बोर्ड लावलेला असायचा . त्यामुळे मी कधीही त्या इमारतीच्या परिसरामध्ये गेलोच नाही .

          ती इमारत पारसी अग्यारी या नावाने ओळखले जाते हे मला माहीत होते .परंतु बाहेरचा बोर्ड पाहिल्यामुळे आतमध्ये जाण्याची कधी हिंमतच झाली नाही .वयाची अगदी तीशी उलटली तरी मी आत कधीच गेलो नव्हतो .                                                  ब्रिटीशकाळातील बंगल्याप्रमाणे उतरत्या पत्र्याचे छत , मध्यभागी त्रिकोणी कमान , त्या कमानीच्या खाली काचांवर सुंदर स्टेनग्लास केलेले पारशी फरोहाचे नक्षीकाम ,दोन्ही बाजूला ब्राऊन कलरचे उभे पट्टे असलेल्या भिंती , भरपूर काचा असलेल्या सागवानी खिडक्या, प्रवेशाद्वाराच्या शेजारी दोन्ही बाजूला गोलाकार रोमन टाईपचे पांढरेशुभ्र स्तंभ, पायऱ्यांशेजारी व्यवस्थित ठेवलेल्या कुंड्या , त्यातील छान फुललेली फुले , आणि सदाबहार बोगनवेलींच्या कमानी , पांढऱ्या शुभ्र पिलर्सला व लोखंडी ग्रील्सला  दरवर्षी स्वच्छ रंगकाम केलेले असते यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांचे  पारसी अग्यारी माणसांचे हमखास लक्ष वेधून घेते .

           पुढे चित्रकार झाल्यानंतर मला पाचगणी येथील जुनी पारशी बंगले , ब्रिटिशकालीन शाळा , डोंगर-दऱ्या रंगवायचा नादच लागला .  पारसी अग्यारीची इमारत चित्र काढण्यासाठी छान वाटायची परंतु तिथे जाण्याची मला संधी मिळत नव्हती व प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती  . 

           पाचगणीला आर्ट गॅलरी काढल्यानंतर एकदा जिमी पंथकी या सधन पारशी माणसाची ओळख झाली . कलाप्रेमी व श्रीमंत असलेल्या या गृहस्थाने माझी काही जलरंगातील चित्रे विकत घेतली आणि घरी बोलावून घेतले . कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट ड्रॉइंग करण्यासाठी मला चित्रांची मोठी ऑर्डर दिली . त्यामध्ये पंचगणी क्लब , पारशी पॉइंट ,सिडने पॉइंट , टेबललॅन्ड , डलविच हाऊस या त्यांच्या पारशी बंगल्याचे व परिसरातील गार्डनचे आणि इतर काही प्रसिद्ध ठिकाणांची चित्र काढण्याची ऑर्डर दिली .त्यामध्ये खास पारसी अग्यारीचे चित्र काढायचे ठरले होते . आणि त्या चित्र काढण्याच्या उद्देशाने मी एके दिवशी सर्व तयारीनिशी प्रथमच पारसी अग्यारीमध्ये प्रवेश केला

          एक ब्लॅक अँड व्हाईट , एक कलर पेन्सील्स व एक वॉटरकलरमध्ये चित्र काढायचे असे ठरवून मी पारसी अग्यारीमध्ये सकाळी लवकरच पोहचलो . प्रवेश करताच गेटजवळच चार्ली चॅप्लीन प्रमाणे तुरूतुरू धावतच एक छोटीशी बुटकी वयस्कर व्यक्ती  माझ्याकडे आली .पांढरीशुभ्र पगडी , पांढरा सदरा व पांढराच पायजमा घातलेला होता.पायात काळे मोजे व सँडल घातलेली ही व्यक्ती मला फार मजेशीर व विनोदी वाटली . आतमध्ये येताच दोन्ही हाताची पाठीमागे घडी ठेऊन त्याने मला पहिला प्रश्न विचारला .

तू काय को अंदर आया ? 

तुम पारशी है क्या ? 

ऐसा किदर भी घुसने का नही बाबा , चल चल पहले बहार निकल . 

यह जगा पारशी लोगोंके लिये है .

तुम्हारा सू काम छे ईधर ? 

एकापाठोपाठ एक असे प्रश्न विचारल्यामुळे मी भांबावूनच गेलो . मी काही बोलायच्या अगोदरच त्यांचे इतके प्रश्न असायचे की मी क्षणभर स्तंभितच झालो . मग मी गप्प झालेले पाहून थोड्या वेळाने तोही बोलायचा थांबला मग मी शांतपणे त्याला डलविच हाऊसचे मालक जिमी पंथकी यांनी मला अग्यारीचे चित्र काढायला पाठवलेले आहे असे सांगितले .

मग तो खुष झाला .

ऐसा पयला बोलने का ना ? 

साल्ला खाली पिल्ली समय बरबाद किया .त्यावेळी त्याने मला सांगितले की त्याचा भाचा बुर्जीन हा येथील मुख्य पुजारी आहे .त्याची तुम्हाला प्रथम परमिशन घ्यायला पाहिजे .मग मी त्याला बुरजीनला बोलवायला पाठवले . मग हा वयस्कर माणूस तुरुतुरु तुरुतुरु पळत उजव्या बाजूस एका छोट्या बंगल्याकडे धावत निघाला . त्या बंगल्याच्या गेटमधून एक उमदा तरुण तशीच पांढरी कपडे व पगडी घातलेला होता तो विशीतला युवक माझ्याकडे आला . मग मी त्याला जिमी पंथकी यांनी चित्र काढायला सांगितले आहे हे सांगितल्यानंतर त्याने मला परवानगी दिली व सोबतच्या व्यक्तीला समजावून पूर्ण मदत करायला सांगितले . त्या व्यक्तीचे नाव होते 

"होरमूसजी " . 

           माझे चित्रकलेचे सामान घेऊन मी आतमध्ये प्रवेश केला . सामान एका ठिकाणी ठेवले व कोणत्या बाजूने चित्र चांगले दिसेल हे पाहण्यासाठी मी प्रथमच इमारतीच्या दोन्ही बाजूला चालत निघालो . त्याच वेळी मी पाहिले की माझ्या पाठीमागेच होरमूसजी मामा देखील पाठीवर हात ठेवून पाठलाग करत माझे निरीक्षण करत आहेत . मी जिकडे जायचो तिकडे पाठीमागे होरमसजी मामा आहेतच . शेवटी एक चांगला चित्र काढण्याचा अँगल निवडून मी माझी छोटी खुर्ची काढून बसलो आणि चित्रकलेचे सामान बाहेर काढायला सुरुवात केली . चित्रकलेचे सामान काढत असताना होरमूसजी मामा लहान मुलाच्या उत्सुकतेने डोळे फाडून एखादा जादूचा खेळ पाहायला आल्यासारखे शेजारी उभे राहून अगदी काटेकोर निरीक्षणच करायला लागले .

हळूहळू मीही थोडासा रिलॅक्स होऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो .

तम्हारा नाम सू छे?

तुम रहता किधर है ? 

तुम्हारा गाव कोनसा है ? 

तुम पेंटिंग कभी से करता है ? 

तुम को कितना पैसा मिलनेवाला है ?

तुम यह पेंटिंग आज  पुरा करेगा क्या? एकापाठोपाठ एक प्रश्न विचारताना मामा थकतच नव्हते . त्यांचे प्रश्न ऐकून आज माझे चित्र पूर्ण होईल की नाही याची मला काळजी लागली .मग मी त्यानां एक प्रश्न विचारला तुम्हारा नाम क्या है ? त्यावेळी त्याने मला सांगितले  

" होरमूसजी ". 

होरमूसजीअंकल मला चित्रासाठी पाणी कुठे मिळेल ? असे मी त्यानां विचारले . मी होरमूसजीला अंकल म्हटल्यानंतर तो माझ्यावर बिघडलाच . मी काय तुझा अंकल नाय मी बुर्जीनचा मामा हाय . त्यामुळे तुही मला होरमूसजी मामा असे बोलायचे असे सांगत त्याने मला तंबीच दिली .  पाण्याचा मग घेऊन तुरूतुरू धावत माझा हा नवा होरमूसजी मामा गार्डनच्या नळाजवळ गेला व त्यांनी माझ्यासाठी पाणी आणले . चित्राच्या स्केचिंगचे काम माझ्या कडून सुरू झाले होते आणि त्याच वेळी होरमूसजी मामांचे माझे चित्र बारकाईने पाहण्याचे कडक निरिक्षणकाम सुरू झाले .

          चित्र काढायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे चित्र काढण्याचे सुचना देत देत मार्गदर्शन करण्याचे काम नव्याने पुन्हा सुरू झाले .

समदा बराबर पिक्चर काढ.

जराभी गलती करू नको .

मी तसा तुला सोडणार नाय . 

मी लय स्ट्रीक्ट माणस आहे . असे सांगत प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणे आली पाहिजे , रेषा सरळ आली पाहिजे , इतकेच काय पण वेगवेगळ्या  झाडाची सगळी पाने , ख्रिसमस ट्री , सिल्व्हरची झाडे चित्रात नीट आली पाहिजेत ,सगळी फुले , सर्व पायऱ्या सर्व खिडक्या चित्रांमध्ये बरोबरच आली पाहिजेत असे त्यांनी मला दम देत बजावले .

          हे सगळे ऐकल्यानंतर आज माझं काही खरं नाही , चित्र पूर्ण होईल की नाही याची मला आणखीनच काळजी लागून राहिली . कलर पेन्सिलने चित्र काढत असताना पहारा देणारे  होरमूसजी मामा अचानकपणे माझ्याकडे तुरूतुरू धावत आले आणि उजव्या बाजूची एक छोटी खिडकी व त्यांचा पारशी सिम्बॉल 

' फरोहा ' मी  नीट काढलेला नाही . मी काम बरोबर करत नाही अशी त्यांनी माझ्याकडे प्रेमाने तक्रार नोंदवली .

         हे सगळं चालू असताना दुपार झाली . आणि लंचसाठी होरमुसजी मामा बंगल्यात गेले आणि मग ही संधी साधून वेगाने मी स्केचिंग व जलरंगात चित्र रंगवायला सुरुवात केली . इतक्यात तुरुतुरु धावत होरमूसजी मामा आलाच व पाठीमागून आवाज आला.

अरे बापरे ! 

समदा सत्यानास झाला . 

तु लई फास्ट काम करते . 

साला पाणी किती गंदा वापरते . 

ये भगवानचा टेम्पल हाय . रंगाचा खराब पाणी वापर नको . साला एकदम घाटी माणस छे .

जरा पिक्चर नीट काढनी . 

सारखा सारखा लई पुढे धावते कशाला ? आणि तुझी खुर्ची किती छोटा हाय . तुझा वजन जादा हाय , एकदम अनकम्फरटेबल बॉडी हाय तुझा . 

असा घाई करेल तो पिक्चर चांगला कसा येल?

        मग होरमूसजी मामाने स्वतः धावत जाऊन आणखी दोन  स्वच्छ पाण्याचे मग भरून आणले. एक छोटा पांढरा मजबुत स्टुल बसायला दिला . इतक्यात त्यांच्या लक्षात आले दुपारचे ऊन खूप तापलेय . मग घरात जाऊन गार्डनच्या छत्रीचा स्टॅन्ड आणला .ती मोठी छत्री त्या स्टॅन्डवर ठेवली . छत्री उघडल्यानंतर खरोखर थंडगार वाटले . मी दुपारी जेवायला उठलो नाही हे त्यांच्या लक्षात आले . आणि मग परत तुरुतुरू चार्ली चॅप्लीनच्या स्टाईलने घरी गेले . एक क्रिमरोल व केकचा मोठा तुकडा , थोड़ी बिस्कीटे आणली . मला जबरदस्तीने काम थांबवून खायला घातले . आणि मग मोठ्याने म्हणाले . . . . .

साला काय खाते नाय , 

पोटात खड्डा पडला  तर पेंटीगचा काम भारी कसा व्होईल ? आता बघ तुजा समदा काम कसा बराबर होईल बघ . पेंटींग करायचा म्हंजे भेजाचा काम हाय . भेजा चालला तरच पिक्चरमंधी जान येईल ना ?

           संध्याकाळी पाचसहा वाजेपर्यंत होरमूसजी मामांची बडबड ऐकत ऐकत व माझी कर्मकहानी सांगत सांगत एकदाचे माझे स्केचिंग व पेंटींगचे काम संपले . मी माझे पुर्ण झालेले पेंटींग बाजुला ठेवले व बॅगेतील कॅमेरा घेऊन काही फोटो काढावयास सुरुवात केली . इतक्यात होरमूसजी मामाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली .

        ये पेंटर , तु कॅमेराचा रोल कौनसा वापरते ? 

तु कोडॅकचा रोल वापरनी . 

त्याचा रिझल्ट लई शंभर टक्का भारी असते . हंड्रेड पर्सेंट क्लिअर कापी येते . खरे तर माझा हा कॅमेरा डिजिटल होता. त्यात रोलची आवश्यकता नव्हती पण मामांची समजूत काढायला मी हो हो कोडॅकचाच वापरतो असे उगाचच म्हणालो .

         आयुष्यात प्रथमच इतकी सतत पारशी कॉमेंट्री ऐकत ऐकत माझे चित्र काढून झाले होते व मी कोडॅक कंपनीचा रोल वापरतो हे ऐकून होरमूसजी मामाजी खूप समाधानाने त्यांच्या पारशी फायर टेम्पलमध्ये गेले व आत जाऊन तेथील फायर टेम्पलचे भस्म त्यांनी माझ्या कपाळी लावले. व विचारले "बोल आता तुला काय पाह्यजे ते समदा माग ". मी त्यानां सांगितले मी नास्तिक आहे व अशा चमत्कारांवर , भस्मांवर माझा अजिबात विश्वास नाही . मग त्यांचे लेक्चर पुन्हा सुरु झाले मग कंटाळून तेच म्हणाले ज्या जिमी पंथकीने पारशी फायर टेम्पलचे चित्र तुला काढायला सांगितले त्याच्या शेजारीच तुझे एक दिवस स्वतःचे घर होईल . एक दिवस पारशी टाईप तुझा मोठ्ठा बंगला असेल . तू कालजी करू नको समदा बराबर व्हईल . साला तुजा मंजी काम लई कमी पण टेंशनच लई जादा असते . डोन्ट वरी .

           मी मनापासून त्यांच्या वेडेपणाला व भोळेपणाला हसलो. कारण त्या डलवीच हाऊसच्या जवळपास सर्वच उच्चभ्रू पारशी रहात होते . सुंदर परिसर असलेल्या श्रीमंत कॉलनीत घर मिळवणे हे खूप अवघड काम होते . स्वप्नात देखील मी कल्पना करू शकत नव्हतो . माझ्यासारख्या शिक्षकी पेशातील कमी बजेट असलेल्या कलाकार माणसाने महिना चार हजार रुपये पगार 

असणाऱ्याने परिस्थितीची जाणीव ठेवली होती . अशी मोठी स्वप्ने पहाणे देखील त्यावेळी वेडेपणाच ठरला असता .

         पुढे माझ्या पाचगणी आर्ट गॅलरीची वाट लागली . एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला . जीवन निराशेने ग्रासले . मी नाईलाजाने एक वर्ष बिलिमोरीया स्कूल व नंतर सेंट पीटर्स या ब्रिटीशकालीन इंग्रजी शाळेत अल्पशा कमी पगारात नोकरी करायला लागलो . शाळेच्याच क्वार्टरमध्ये रहात होतो कारण सख्ख्या चुलतभावाने आमच्या घराचा ताबा घेऊन आईवडीलांसह सर्वानां हाकलून लावले होते . कमी पगार  असल्यामूळे घराची सर्व स्वप्ने बघणे सोडून दिले होते . जीवन जगणे बेचिराख झाले होते . 

          पण नंतर नशीब आणि चित्रकलेने खूपच मोठी साथ दिली . मुंबईला ऑबेराय टॉवर्स गॅलरी , नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, जहाँगीर आर्ट गॅलरी , म्युझियम आर्ट गॅलरी याठिकाणी माझी यशस्वी चित्रप्रदर्शने झाली .असा काय चमत्कार झाला की माझी परिस्थिती पूर्णपणे पालटली . माझ्याकडे पैसे आले व  मी सेंट पीटर्सची नोकरी सोडत असतानाच  घराचा शोध घ्यायला सुरुवात केली . पहिलेच घर मिळाले ते पॅरामाऊंट सोसायटीत . जीमी पंथकीच्या डलविच हाऊस या घराजवळच . जेथे माझे  पारशी अग्यारीचे काढलेले स्केच व चित्रे लावलेली होती . ते घर कसे मिळाले त्याचीही एक अजब व मजेशीर कथा आहे पण ती कधीतरी नंतर सविस्तर लिहीन .            आता मी वाईजवळ पारशीटाईप निसर्ग बंगल्यात राहतो . अधूनमधून पाचगणीच्या घरी जात असतो .आजही ते रो हाऊस मला पाचगणीच्या पारशी अग्यारीची व होरमूसजी मामांच्या शब्दांची सतत  आठवण करून देते.

         ज्यावेळी प्रथम घर मिळाल्यावर मी लगेच खूप वेळा  पारशी अग्यारीत गेलो .पण तेथे आता सफेद  पगडी ,सफेद पायजमा ,सफेद फुलहाताचा सदरा घालून तुरुतुरु चार्ली चॅप्लीनसारखे धावणारे , चित्र काढताना अनेक प्रश्न विचारणारे , खराब पाणी लगबगीने बदलून देणारे , डोक्यावर ऊन लागेल म्हणून छत्री आणून देणारे , चित्र काढताना भेजा थंडा ठेव असे प्रेमाने सांगणारे  होरमूसजी मामा दिसले नव्हते . 

            पण त्यावेळी माझ्याकडे काहीही नसताना घराच्या रुपाने तुला डोक्यावर छत्र नक्की मिळेल असा विश्वास देणारे व तुझे एक छोटे दोन खोल्यांचे घर तुझ्या चुलतभावाने फसवून घेतले तरी तुला मोठे पारशाच्या शेजारी नक्की घर मिळेल असे आत्मविश्वासाने सांगणारे व आता दोनदोन पारशीटाईप घरे मिळाल्यावर तर होरमूसजी मामा  मनातून कसे विसरले जातील ना ?

            काही वर्षांपूर्वी एकदा  पारशी अग्यारीच्या जवळून जाताना मला होरमूसजी मामा अचानकपणे दिसले . मी खूप आनंदी झालो .लगबगीने माझी चारचाकी गाडी बाहेर पार्क करून अग्यारीच्या कंपाऊंडमध्ये घुसलो . मला बघताच त्यांनी मला हाताने ठेंगा दाखवला . मग हसत हसत म्हणाले मी तुला कसा उल्लू बनवले . साला मला उल्लू बनवते काय? कोडॅकचा रोल वापरते म्हणून खोट्टा सांगते .

 " आता तुला सांगते  माझा खरा नाव तर होरमूसजी हायेच नाय ". 

मग त्यांच्या पाठोपाठ मी धावत  विचारले मग काय नाव आहे तुमचे ? 

तर तुरुतुरु चार्ली चॅप्लीनप्रमाणे चालत धावत ते आग्यारीत आत घुसले मी देखील त्यांच्यापाठोपाठ आत घुसू लागलो तसे त्यांनी मला थांब थांब असे मोठ्याने ओरडतच थांबवले व हाताने पाटीकडे बोट दाखवले. तेथे लिहले होते.


"पारशीशिवाय आत प्रवेश करण्यास मनाई आहे. " 


त्यादिवशी मी खूप तास बाहेर तेथे थांबलो .

नंतर अनेकवेळा तेथे गेलो .

अनेकदा परत पारसी अग्यारीची चित्रे काढली .

पण होरमूसजी मामा बरीच वर्षे उलटली तरी 

परत कधी बाहेर दिसलेच नाहीत .

परत कधी बाहेर दिसलेच नाहीत .


         त्यानंतर पेंटीग करायला आऊटडोअरला भर उन्हात कार मधून जाताना आता मी मोठी छत्री व स्टॅन्ड घेऊन जातो . बसायला छोटे मजबूत खूर्ची किंवा स्टूल नेतो . पाण्यासाठी दोनतीन प्लास्टीकचे मग नेतो . खायला व्यवस्थित टिफीन घेऊन जातो . बिस्किटांचा पूडा व कॉफीचा थर्मास सोबत नेतो कारण मग होरमूसजी मामांच्या म्हणण्यानुसार "साला खाल्ला नाय तर पोटात खड्डा पडेल मग पेंटिंग भारी कसा होणार ? भेजा काम कसा करेल ? पेंटिग करायचा म्हणजे भेजा लई वापरावा लागतो ना ?

          आजही माझे डोळे भिरभिरत्या , हरवलेल्या नजरेने पाचगणीत अग्यारीच्या परिसरातमध्ये सतत शोध घेत असतात .

आजही मला प्रश्न पडतो . 

खरंच त्यांचे नाव होरमूसजी होते का ? 

नसेल , 

तर मग त्यांचे खरं नाव काय होते ? 

मग मला ते परत का दिसले नाहीत ?  

कोठे गेले असतील ते ?

परत कधी भेटतील का हो?

माझे ,

होरमूसजी मामा ??????? 


सुनील काळे

9423966486

रविवार, १९ मे, २०२४

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व

डॉ.शंतनू अभ्यंकर - एक बहुआयामी व्यक्तिमत्व
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
       " पुणे तेथे काय उणे " अशी म्हण फार प्रसिद्ध आहे .कारण पुण्यात फार पूर्वीपासूनच काहीही उणे नव्हते आणि आताही नाही आणि यापुढेही असणार नाही . कारण अनेक अभ्यासू, कार्यप्रवीण , व्यासंगी ,बहुआयामी व चतुरस्त्र , अफाट व्यक्तिमत्वे असलेली मंडळी त्यावेळी पुण्यात होती आतादेखील आहेत आणि यापुढेही असणार आहेत . या पुण्यानंतर नंबर लागतो तो बहुतेक वाईचा . कारण वाईला अशा अद्भूत व्यक्तिमत्वांचा खूप भरणा आहे याचा मला हळूहळू शोध लागतो आहे . आज अशाच एका व्यासंगी , बहुआयामी व्यक्तिमत्वाची महती सांगतो .
         १८५७ च्या बंडानंतर ब्रिटिश साम्राज्याने भारतावर चांगली पकड बसवली . बऱ्यापैकी स्थिरता आल्यामूळे त्यांनी अनेक हिलस्टेशने नवी शहरे ,गावे विकसित केली . अनेक नव्या प्रशासकीय इमारती , शाळा , कॉलेज निर्माण करून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला . पाचगणीची हवा व आरोग्यपूर्ण वातावरण याचा अभ्यास करून 1895 साली सेंट जोसेफ शाळा टेबललँडच्या पायथ्याशी बांधली . ती पाचगणीतील  पहिली शाळा . त्यानंतर 1898 साली किमिन्स व 1904 साली सेंट पीटर्स या शाळा सुरु केल्या . धर्मप्रसार व त्यासाठी अनुकूल ख्रिश्चन संस्कृती वातावरण निर्माण करण्यासाठी दोन चर्चेस बांधली आणि मग इंग्रजी शाळेत जाणे एक प्रतिष्ठेची बाब ठरली .
         अशा प्रतिकूल वातावरणात कृष्णराव पंडीत व रावसाहेब पंडीत या बंधूनी आपली भारतीय संस्कृती जपण्यासाठी हिंदू स्कूल निर्माण केले . पुढे त्याचे नाव संजीवन झाले . या संजीवन शाळेचे पूर्वीचे वैशिष्ठ्य म्हणजे ते रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनच्या धर्तीवर आधारीत होते . इंग्रजी माध्यामांबरोबर सातवीनंतर दहावीपर्यंत स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठी मराठी माध्यमातून 8 वी ते 10वी पर्यंत वर्ग सुरु केले होते . अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी चाचणी परिक्षा द्यावी लागायची . मी व माझे तीन मित्र त्या परिक्षेत उतीर्ण झालो व शाळेत जाऊ लागलो .
          संजीवन शाळेचे लोकेशन व शाळेचे एकंदर वातावरण फार मनमोहक होते . पाचगणी क्लबच्या रस्त्यावरून डावीकडे वळलो की ब्रिटीशांची शाळा लागायची व त्यानंतर त्यांचे हॉस्पीटल व लॉरेन्स व्हिला बंगला या दोघांमधून संजीवनचा रस्ता लागायचा . शाळेच्या या रस्त्यावरून चालत खाली उताराच्या रस्त्याला लागलो की डाव्या बाजूला छोटे छोटे दुपाकी पत्र्याची गावकडची घरे असल्यासारखी शाळेचे वर्ग असायचे . सभोवताली भरपूर हिरवीगार वनश्री व लाल दगडांच्या भिंती व थोड्या पायऱ्या चढून गेले की मराठी माध्यमाचे वर्ग असायचे .
      इंग्रजी व मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी वेगवेगळ्या इमारती असल्या तरी सर्वांच्या प्रार्थना मात्र एकत्र व्हायच्या . त्यावेळी राष्ट्रगीत  व वेगवेगळी गाणी एकत्र म्हणायचो त्याची एक छोटी पुस्तिका छापलेली आजही जपून ठेवलेली आहे .
          या शाळेत चित्रकला , संगीत शिक्षक असायचे . शाळेत उत्तम भव्य वाचनालय होते . तेथे जानकीताई पंडीत असायच्या तेथे शांतपणे पुस्तके वाचणे एक सुंदर अनुभव असायचा . तेथे सतत वाचन करणारी विद्यार्थीमंडळी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उतुंग पदावर पोहचलेली आहेत ,  कलाक्षेत्रात व व्यावसायिक क्षेत्रात भरारी मारून नाव कमावलेली देश विदेशातील ही मंडळी अजूनही पाचगणीचे शाळेचे दिवस विसरलेली नाहीत . 
           संजीवनशाळेत फक्त पुस्तकी शिक्षणच नाहीतर अनेक कलागुणांचा विकास व्हावा, शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या येथील विद्यार्थी परिपूर्ण व्हावीत म्हणून भर दिला जायचा . माझ्या1982 च्या दहावीच्या बॅचमध्ये संगीतकार ललीतराज पंडीत , अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले नीरज हातेकर होते . अशा प्रत्येक बॅचमध्ये अनेक उत्तम विद्यार्थी शाळेने घडवले . 1922 साली शाळेने शताब्दी महोत्सव साजरा केला . अशा शाळेत आमच्या अगोदरच्या बॅचमध्ये शंतनू अभ्यंकर होता . तो मूळचा वाईचा पण 5 वी नंतर मराठी माध्यमातून डायरेक्ट इंग्रजी माध्यमात शिकण्यासाठी संजीवनला बोर्डिंग शाळेत आला . बोर्डींग स्कूलमध्ये राहणारे विद्यार्थी तेथेच राहत असल्यामुळे शिक्षणाबरोबरच अनेक गोष्टींमध्ये पारंगत होतात . नाटक , कविसंमेलन , वाचन , वक्तृत्व , खेळांचे विविध प्रकार त्यानां अनुभवता येतात .काहीजण त्यांचा शेवटपर्यंत पाठपुरावा करतात व त्याविषयांवर कमांड मिळवतात . अर्थात स्वतःची एक मूलभूत हुशारी अशा मुलांमध्ये असेल तर शाळेत या हिऱ्यानां पैलू पाडले जातात. 
डॉक्टर शंतनू अभ्यंकर त्यापैकी एक चमकणारा हिरा.
           दहा वर्षांपूर्वी मी पाचगणीतून कायमस्वरूपी वाईजवळ राहायला आलो . वाचनाची आवड असल्याने लोकमान्य टिळक वाचनालयाचा सदस्य झालो . तेथे अनिल जोशी सर , भालचंद्र मोने , प्रा .सदाशिव फडणीस , डॉ .राजेन्द्र प्रभूणे , श्री . मधू नेने, लक्ष्मीकांत रांजणे , ॲड .उमेश सणस व इतर अनेक जणाच्यां ओळखी झाल्या . वाचनालयातर्फे भरणाऱ्या वसंत व्याख्यानमाला व इतर अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याचदा जावू लागलो . त्यावेळी या मंडळीचा अगदी जवळून जीवनक्रम पाहता आला आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे , व्यासंगामुळे , बहुआयामी गुणांमुळे व विविध क्षेत्रातील कामाचा झपाटा पाहून मी खूपच प्रभावित झालो .
             यावर्षी डॉ. शंतनू अभ्यंकर हे लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष झाले आहेत . अध्यक्ष झाल्यानंतर ग्रंथालयात अनेक उपक्रम व सुधारणांचा त्यांनी झपाटा लावला आहे . ग्रंथालयाचे रुपडे नव्या संचालक मंडळीनी बदलून टाकले आहे . नुकतेच पार पाडलेले वाई पंचक्रोशी साहित्य संमेलन योग्य व सुंदर नियोजनाच्या अनेक गोष्टींमुळे सर्वांच्या लक्षात राहीले आहे .
           शिकत असताना मी चित्रकार प्रताप मुळीकांच्या स्टुडीओत अमर चित्रकथेच्या कॉमिक्सचे लेटरींग करायला जायचो . कॉमिक्स मध्ये राम ,लक्ष्मण , कृष्ण , इन्स्पेक्टर विक्रम , अशी पात्रे असायची . त्यासाठी जे मॉडेल असेल ते शंतनू सारखे असावे . प्रसन्न हसरा चेहरा , उंच , गोरा रंग व भुरुभरु वाऱ्याने उडणारे केस डाव्या हाताने सतत सरळ ठेवणारे डॉ .शंतनू मला एखाद्या चित्रपट अभिनेत्यासारखे किंवा कॉमिक्सचे मॉडेल वाटतात . त्यांचा एखादा कार्यक्रम सुरु असेल तर मी पुढे बसायचो व असंख्य फोटो काढायचो . त्यातील काही फोटो त्यांनां पाठवायचो मग ते आवडल्याचा इमोजी हमखास पाठवतातच .
       डॉ. शंतनूचे लेख वाचायला लागलो की माझे डोक्यावरचे केस उभे राहतात व भूवया विस्फरतात . त्यांची लेखनशैली व डॉक्टरी ज्ञानाची सुसंगत अभ्यासपूर्वक मांडणी वाचून वाचक तोडांत बोटे घालतो . डॉक्टर ब्लॉग लिहतात , भाषणे देतात , अनेक वैद्यकीय कॉन्फरसला , अनेक वसंत व्याखानमाला , शारदीय व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावतात . ते उत्तम लिहतात , कविता करतात, उत्स्फूर्तपणे भरपूर भ्रमंती करतात , रसाळ वाणीने श्रोत्यांनां तृप्त करतात . अनेक अवजड न समजणाऱ्या पुस्तकांचे सहज सोप्या शब्दात भाषांतर करतात . ते उत्तम भाषांतरकार तर आहेत पण उत्तम लेखकही आहेत .
मला शास्त्रज्ञ व्हायचयं , पाळी मिळी गुपचिळी ,आरोग्यवती भव , फादर टेरेसा आणि इतर वल्ली, बायकांत पुरुष लांबोडा, रिचर्ड डॉकिन्स जादूई वास्तव , आधुनिक वैद्यकीची शोधगाथा ,इ  दहा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे . लोकमत , महाअनुभव , दिव्यमराठी या मासिकांमधून व वर्तमानपत्रात नियमित लेख लिहत असतात . दिवाळी अंकात तर त्यांचे लेख येतातच . 
         एवढे मोठे लेख वाचताना  ते कधी लिहित असतील या विचारांनीच मी भारावून जातो . शेवटी एकदा मी मुद्दाम त्यांच्या मॉडर्न हॉस्पीटलला  व्हीजीट दिली तर कॉरीडॉरमध्ये पेशंटच्या बाहेर रांगा लागल्या होत्या . तर हे डॉक्टर महाशय दोन पेशंटच्या तपासणी दरम्यान जो थोडासा वेळ मिळतो त्यावेळी दोनचार ओळी टाईप करून परत हसतमुखाने दुसऱ्या पेशंटबरोबर बोलत असतात . या त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा मला आचंबा वाटतो कारण मला शांतता असेल तरच काही लेखन किंवा चित्र निर्माण करता येते . अशा गप्पा मारता मारता लेखाची कंटिन्यूटी ठेवणे मला तर जमणारच नाही त्यामुळे ते प्रकरण लई भारी काम वाटते . इंपॉसिबल वाटते .
      डॉक्टर होमियोपॅथीचे शिक्षण पूर्ण करून काही दिवस प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते . त्याचवेळी बी.जे मेडीकलमध्ये MBBS करत होते . नंतर MD झाले . प्रसुतिशास्त्र व स्त्रीआरोग्य शिक्षणसाक्षरता करणे त्यांचा आवडीचा विषय आहे . विज्ञान परिषदेचे पहिले सचीव , राष्ट्रीय स्त्री आरोग्य संघटनेचे ते ॲक्टीव्ह मेंबर आहेत .
          उत्तम भाषांतरकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत . माझ्या प्रदर्शनाच्या ब्रोशरचा लेख  इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभूत्व असल्याने सुंदरित्या करून दिले . ते वाईत राहत असल्याने अनेक वक्त्यांची भाषणे त्यांनी ऐकली असावीत त्यामुळे ते उत्तम वक्ता आहेत . अनेक इंग्रजी शब्दानां त्यांनी मराठीत नवी नावे निर्माण केली आहेत . डॉक्टर उत्तम मुलाखतकार आहेत . कोणत्याही व्यक्तीचा कोणताही विषय असो त्या विषयात ते सहज प्रवेश करतात .अनेकानां बोलते करण्याची कसोटी त्यांच्याकडे आहे .
           राधिकासांत्वनम नावाचा मूळ तेलगू भाषेतील इंग्रजी ग्रंथ स्वतः भाषांतरीत करून त्यांची पत्नी रुपाली अभ्यंकर यांचेबरोबर अभिवाचनाचा त्यांचा कार्यक्रम पाहून ऐकून मी थक्क झालो . त्यावेळी कळते हे दोघे प्रसिद्ध डॉक्टर तर आहेत पण भारी ॲक्टरही आहेत .त्यांचे सादरीकरण ते पुणे , मिरज , नाशिक , मुंबई इ .अनेक शहरांमध्ये करत असतात . त्या कार्यक्रमाला त्यानां रसिकांची खूप पसंति, वाहवा मिळते .
       मध्यंतरी लक्ष्मीकांत रांजणे व त्यांचा एका कथाकथनाचा कार्यक्रम होता . डॉक्टर त्यांची स्वलिखित कथा अशी सहज सांगत होते की माणसाचे लक्ष खिळवून ठेवण्याचे कौशल्य त्याच्यांकडे आहे हे जाणवते . संपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे त्यांचे शब्दप्रभूत्व असामान्य आहे . ते शंतनू ऊवाच नावाचा ब्लॉग लिहतात पंचाहत्तर हजारांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स आहेत . त्यांचा हा कामाचा आवाका पाहून आपण चित्रकाराचे रिटायर्ड लाईफ फारच आळशीपणाने जगतोय याची मला सतत जाणीव होत राहते . मला अनेक गोष्टींचा कंटाळा तर लगेच येतो पण डॉक्टर मात्र वेगळेच आहेत . 
        विश्वकोश , प्राज्ञपाठशाळा , डॉक्टरांच्या मेडीकल असो. व इतर अनेक संस्थामध्ये ते कार्यरत असतात शिवाय संपूर्ण कुटूंबातील सर्व सदस्यानां संभाळून ते आता आजोबांचीही भुमिका उत्तमपणे सांभाळत असतात .
            मध्यंतरी करोनाच्या काळात मी करोनाग्रस्त झालो व  पायाच्या अपघातातही सापडलो मला कम्पलसरी बेडरेस्ट होती . त्यावेळी कळाले डॉक्टर फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे आजारी आहेत . त्या आजाराच्या गोष्टींचा भलामोठा लेख त्यांनी लिहला होता . तो वाचून मानवी जीवन किती साधारण व अनिश्चित आहे हे लक्षात आले . डोळ्यात पाणी आले व हृदय गलबलून गेले . मग डोळ्यांपुढे डॉक्टरांचा हसरा चेहरा सतत नेहमी दिसू लागला . डॉक्टर पण जिद्दी माणूस . आपल्या आजाराचा बाऊ न करता आपल्या कामात त्यांनी झोकून दिले . त्यांची केमोथेरपी व इतर उपचार यांचा कोणाला थांगपत्ता न लागून देता अनेक लेख , कविता , व्याखाने भाषांतरे यामध्ये ते सतत मग्न राहत असतात . 
         आमच्या येण्याजाण्याच्या मेणवलीच्या रस्त्यावरून वॉकिंग करताना डॉक्टर तीनचारवेळा दिसले व आजारावर त्यांनी नियंत्रण मिळवल्याचे दिसले .
            मी सातारा जिल्ह्यात प्रदर्शन करतच नाही कारण तेथे प्रदर्शनाचा सुसज्ज हॉलच नसतो . चित्र टांगण्याची , भिंतीचा रंग , प्रकाशयोजना नसतेच . मग चित्र लावणार कशी ? अशा अनेक तक्रारी व कारणे सांगून मी प्रदर्शन टाळतो . 
      एक दिवस लायब्ररीत पुस्तक बदलण्यासाठी गेलो होतो तर महावीर जंयतीची सुट्टी होती . मग ऑफिसमध्ये गेलो तर अमित वाडकर , तनुजा इनामदार , राजेश भोज (सर) व तोंडाला मास्क बांधून अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर हे सगळेजण वक्ता कोण असणार ? प्रस्तावना कोण देणार ? अध्यक्ष कोण होणार ? समारोपाच्या शेवटी आभारप्रदर्शन कोण करणार ? असे एकूण एकवीस दिवसांचे नियोजन व फोनाफोनी करत बसले होते . ते पाहून मला डॉक्टरांचे पुन्हा कौतूक वाटले . त्यांनी मला चित्रप्रदर्शनासाठी पुन्हा विचारले , मग मी नाही म्हणू शकलो नाही . काय सांगावे कदाचित वाईत प्रदर्शन करायचेच राहून जाईल असे वाटले . त्यादिवशी डॉक्टर मला आनंद चित्रपटातील राजेश खन्नासारखे वाटले . जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जिसे न आप बदल सकते है न मै . हम सब तो रंगमंच की कठपुतलियां है, जिनकी डोर उपर वाले के उंगलियो में बंधी है । कब कौन कैसे उठेगा ये कोई नहीं बता सकता । 
जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नही .
       डॉक्टर असून स्वतः पेशंट असूनही ते वाईच्या लायब्ररीच्या कामासाठी , वसंत व्याख्यानमाला सुंदर व्हावी म्हणून इतकी मेहनत करतात तर आपणही वाईकरांसाठी एक छान प्रदर्शन का करू नये ? हे ठरवून मी लगेच कामाला लागलो . 
        तर अशा या व्यासंगी डॉक्टर शंतनू अभ्यंकर या आमच्या संजीवनच्या तालीमेत तयार झालेल्या शाळेकरी मित्राच्या आग्रहामुळे व अनेक वाईकरांच्या प्रेमळ विनंतीमुळे यावर्षी वाईत प्रदर्शन करणार आहे .
खरं सांगायचे तर अजून पूर्ण डॉक्टर मलाच समजले नाहीत कारण ते व्यक्तिमत्व बहुआयामी व समजण्यापलीकडचे आहे . त्यांच्या या बहुगुण संपन्न व्यक्तीमत्वामुळे अनेक क्षेत्रातील अनेक मित्रमंडळीचा मेळा त्यांच्याकडे नेहमी असतो अशा सर्व मित्रां तर्फे या डॉक्टर मित्राला उत्तम निरोगी दिर्घायुष्य लाभो हीच विधात्याकडे मागणी करतो व थांबतो .
थोडक्यात सांगायचे तर डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे व्यक्तीमत्व सर्व वाईकरांनां आवडणारे असे 
" वाईभूषण " 
बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.

सोबत प्रदर्शनाची निमंत्रणपत्रिका सोबत आहेच . 
यावर्षी १०८ वर्ष पूर्ण करणाऱ्या वसंत व्याखानमालेत अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत त्याचीही कार्यक्रमपत्रिका सोबत पाठवत आहे .
सर्वांनी जरूर या !
सर्वांनां सप्रेम निमंत्रण🙏

चित्रकार सुनील व स्वाती काळे यांचे
" व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स "
पाचगणी , वाई , महाबळेश्वर येथील निसर्गसंपन्न परिसरातील जलरंग व तैलरंगातील निसर्गचित्रांचे चित्रप्रदर्शन .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लोकमान्य टिळक वाचनालय 
वाई .४१२८०३
प्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख पाहूणे श्री . विश्वास पाटील , श्री .अनिल जोशी व डॉ. शंतनू अभ्यंकर व संचालक मंडळ टिळक लायब्ररी यांच्या उपस्थितीत १ मे रोजी संध्याकाळी करण्याचे ठरवले आहे . तुम्ही देखील उपस्थितीत राहावे यासाठी पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रदर्शनाची वेळ : रोज सकाळी १० ते १२ व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत .
दिनांक : १ ते २१ मे २०२४ पर्यंत
प्रवेशमुल्य नाही . 🙏सर्वांनां मुक्त प्रवेश🙏

✍️सुनील काळे (चित्रकार)
     9423966486

वाई ,पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन

* वाई ,पाचगणी व महाबळेश्वरचे कलापर्यटन *
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
 लोकसत्ता - 24 फेब्रूवारी 2024 . पर्यटन विशेषांक .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟         
              वाई ,पाचगणी आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्राची नावाजलेली ठिकाणे आहेत . वाई हे पर्यटनाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, काही जण वाईला दक्षिण काशी असेही संबोधतात . तीर्थक्षेत्र ही जशी वाईची ओळख आहे तसेच फार पूर्वीपासून विद्वान मंडळीचे गाव किंवा विश्वकोश निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींमुळे वाईला महत्व प्राप्त झाले आहे .
          वाई पासून बारा कि .मी अंतरावर पसरणीचा वेडावाकडा घाट पार करून पोहचले की थंडगार वाऱ्याच्या झुळका सुरु झाल्या की ओळखायचे आपण पाचगणीत पोहचत आहोत . पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीला ओळखतातच पण त्याहीपेक्षा ब्रिटींशानी सुरु केलेल्या रेसिडेन्सल बोर्डींग स्कूल्समुळे पांचगणीला एक नवी ओळख मिळाली आहे .
         महाबळेश्वर हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन व उंचावर असलेले गिरिस्थान आहे . थंड हवेच्या ठिकाणाबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणूनही महाबळेश्वरला महत्व आहे . क्षेत्र महाबळेश्वर येथील पुरातन पंचगगा व कृष्णाबाईचे मंदीरे , कृष्णा नदीचे उगमस्थान व पंचनद्याचे संगमस्थान यामुळे तीर्थक्षेत्र म्हणूनही प्राचीन काळापासून क्षेत्रमहाबळेश्वर सुप्रसिद्ध होते . अशा या महाबळेश्वर पाचगणीला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचे श्रेय मात्र ब्रिटिशांना किंवा गोऱ्यासाहेबांना दिलेच पाहीजे . याचे मुख्य कारण म्हणजे येथील थंडगार हवा , सुंदर वनश्री , आल्हाददायक वातावरण ही वैशिष्ठये असली तरी या ठिकाणाला येण्यासाठी चांगले रस्ते नव्हते . राहण्यासाठी प्रशस्त बंगले , निवासस्थाने , क्लब्ज , बाजारपेठ , नव्या सुंदर पॉईंटसचा शोध घेऊन तेथपर्यंत अवघड डोंगराळ जागी पोहचण्यासाठी लागणारे रस्ते विकसित करण्याचे काम ब्रिटीश राजवटीत सुरु झाले . पुणे किंवा मुंबईतील असह्य उकाड्यामुळे उन्हाळ्यातील मे महिन्यात व्हाईसरॉय , गव्हर्नरसाहेब यांनी राज्यकारभार करण्यासाठी महाबळेश्वर येथून राजभवन किंवा गव्हर्नर हाऊस नावाचे प्रशस्त बंगले बांधले व खऱ्या अर्थाने पर्यटनाची कारकीर्द सुरू केली . या ठिकाणांचा प्रसार व प्रचार केला त्यामुळे अनेक ब्रिटीश अधिकारी व भारतातील राजे , श्रीमंत व्यापारी , प्रसिद्ध उदयोजक त्यांची बायका मुले  सर्व परिवार घेऊन मित्रमंडळीसोबत सातत्याने  येथे येऊ लागली व हळूहळू खऱ्या जीवनावश्यक सुविधा येथे पुरविल्या जाऊ लागल्या . त्याचबरोबर अनेक इंग्रज कलाकार मंडळी येथे निसर्गचित्र काढण्यासाठी येऊ लागले .
            परमेश्वराकडे माझ्या अनेक तक्रारी आहेत पण एका गोष्टीविषयी मी सतत त्याचा कृतज्ञ आहे की त्याने माझा जन्म व बालपण पाचगणीसारख्या सुंदर  निसर्गरम्यस्थानी  घालवले . लोकसत्ताने जेव्हा या तीन ठिकाणी चित्रकाराच्यादृष्टीने या पर्यटनस्थळांचे काय महत्व आहे असा विषय मांडायला सांगितले त्यावेळी जवळपास पन्नासवर्षांपासूनचा एका कलाकाराचा समृद्ध जीवनपटच माझ्या डोळ्यापुढे सरकला . सगळ्या आठवणी जाग्या झाल्या सष्टपणे डोळ्यासमोर चित्र दिसू लागले . 
           साधारण पन्नासपूर्वी म्हणजे 1975 च्या दरम्यान आम्ही मुले पाचगणीच्या मराठी शाळेत  शिकत होतो . त्या कोवळ्या आठ दहा या बालीश  वयात पाचगणीच्या गावाबाहेर जकात नाक्याशेजारी एका शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या शाळेनंतर आम्ही मुले शाळा सारावण्यासाठी शेण गोळा करायला जात होतो . त्यावेळी त्या दुपारच्या शांत वेळी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले . एक वयस्कर जाडजूड रिचर्ड ॲटनबरोसारखा दिसणारा गोरापान म्हातारा माणूस डोक्यावर मोठी फेल्टहॅट घालून रंगाची एक मोठी पेटी घेऊन छान ब्रशेस कागदाचे पॅड घेऊन बिलिमोरीया स्कूलच्या बाहेर मुख्य रस्त्याच्या कडेला निवांतपणे एक चित्र काढत होता . हा म्हातारा नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी आम्ही मुले त्याच्या बाजूला गोळा झालो . अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे समोरच्या दृश्याचे पेन्सीलने केलेले रेखाटन व सुंदर रंगसगतीने चित्रित केलेले कृष्णाव्हॅलीचे ते पाहिलेले पहीले 
डेमोन्सस्ट्रेशन नंतरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले . सगळी मुले गेली पण मी मात्र या गोऱ्या चित्रकाराचा शेवटपर्यंत पाठलाग केला . त्यावेळी ते गृहस्थ पाचगणीच्या प्रसिद्ध एम आर ए या राजमोहन गांधी यांच्या संस्थेत गेले . पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचे नाव व कार्य कळले . या चित्रकाराचे नाव होते  गॉर्डन ब्राऊन . हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे पण त्यांनी नैतिक पुनरुत्थान केन्द्र (MRA ) ही संस्था उभी करण्यासाठी आर्किटेक्ट म्हणून फुकट काम केले . राजमोहन यांच्या प्रेमाखातर ऑस्ट्रेलियातून स्वखर्चाने येऊन संस्थेचे वास्तूनिर्मितीचे नियोजन व पूर्ण त्रेसष्ट एकरात एक भव्य प्रकल्प उभा केला . पण येथील सुंदर वातावरण , टेबललॅन्डची पठाराखालची संस्था , कृष्णा व्हॅलीची , रस्त्यांची त्यांनी अनेक चित्रे जलरंगात साकारली . त्यातील काही चित्रे एम आर ए या संस्थेच्या इमारतीमध्ये आजही पाहता येतात .
           त्यानंतर कलाशिक्षक सुभाष बोंगाळे यांनी अनेक चित्रे जलरंगात जागेवर जाऊन रेखाटलेली आहेत . हिरव्या शेवाळी रंगाच्या सायकलला एक पाठीमागे स्टॅन्ड बांधून रंगाचे सामान घेऊन सिडने पॉईंटच्या व्हॅलीत बोंगाळे सर सतत स्केचिंग व लॅन्डसेकप्स करत बसायचे . पाचगणीच्या या संराच्या चित्रनिर्मितीच प्रेरणा घेऊन मी या लेखाचा लेखक  सुनील काळे आयुष्यभर या परिसरात रेखाटणे करत व जलरंग वापरून सातत्याने तीस पस्तीस वर्ष चित्र काढत राहीलो आहे . कृष्णानदीच्या किनाऱ्यावर धोमधरण बांधल्यानंतर पाचगणीच्या विविध भागातून दिसणारे विहंगम दृश्य , चिखली , पसरणी या गावांची बारावाडीची दिसणारी भातशेती , चमकणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या रांगा , पाचगणीचे दुतर्फा रस्त्याच्या बाजूला असलेली भव्य वडाची झाडे , अशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सपाट पठार म्हणून प्रसिद्ध असलेली टेबललॅन्डची पठारे या पाच पठारावरून दिसणारे पाचगणी गावाचे दृश्य विलोभनीय दिसते . खिंगर , दांडेघर , आंब्रळ , राजपुरी , तायघाट , भिलार या सभोवतालच्या गावामध्ये पसरलेले शंभर एकरचे एकेक सपाट पठार रंगवणे हे आयुष्यभर आनंद देणारे कार्य ठरले . ब्रिटिशांनी त्यांच्या मुलांमुलीसाठी येथे प्रथम त्यांचा जॉन चेसन नावाचा रिटायर्ड ऑफीसर पाठवून भरपूर अभ्यास केला . सिल्व्हर वृक्षाची झाडे लावली . प्रत्येक वर्षातील बारा महिन्यांचे तापमान पाहून तीनही ऋतूमध्ये काय काय फरक दिसतो याच्या सविस्तर नोंदी केल्या . रिकाम्या पसरलेल्या जागेत मोठ्या शाळा व राहण्यासाठी वसतिगृहे बांधली बंगले बांधले . रस्त्यांचे नियोजन केले . स्ट्रॉबेरी , बटाटा , कॉफी व इतर अनेक फळझाडे वृक्षांची लागवड केली . नगरपालीका बांधली . ऑफीसर्स राहण्यासाठी विश्रामगृहे बांधली . प्रथमच टेबललॅन्डच्या पायथ्याशी शाळा बांधली या शाळांपैकी सेंट जोसेफ स्कूल , किमिन्स स्कूल , सेंट पीटर्स स्कूल , यांनी सव्वाशे वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे . 
          परंतू सव्वाशे वर्ष होवूनसुद्धा  आजही किमिन्स , सेंट जोसेफ या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे सुशिक्षित कलाशिक्षक नसल्याने चांगले कलाकार निर्माण झाले नाहीत किंवा कलापरंपरां निर्माण झाली नाही . चित्रसंस्कृती टिकून राहीली नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे .
         सुनील व स्वाती काळे या दाम्पत्याने मात्र या परिसराचा सखोल अभ्यास करून येथील किमिन्स , सेंट पीटर्स , बिलीमोरीया , या शाळांसोबत अनेक ब्रिटीशकालीन बंगले , पारशी लोकांचे बंगले , अग्यारी , चर्चेस , या वास्तूंचे जलरंगात चित्रिकरण केले . गावातील मुख्यरस्ते , सुंदर वनश्री , गार्डनमधील फुले , कुंड्या , कॉसमॉस , हॉलिहॉक्स ,वॉटरलिलीज , रानफुले  तैलरंगात रंगवून पाचगणीचा निसर्ग अनेक मान्यवर कलाप्रेमी मंडळीच्या घरी व अनेक देशात चित्रे विकली त्यामुळे पाचगणी ,महाबळेश्वर व वाईपरिसरातील चित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . नुकतेच त्यांचे प्रदर्शन नेहरू सेंटर येथील AC व सर्क्युलर आर्ट गॅलरीमध्ये भरले होते त्याठिकाणी त्यांनां चित्र रसिकांकडून भरघोस अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला .
            वाई हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे गाव आहे . लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोष निर्मितीचे संपादक मंडळाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केले . त्याकामासाठी अनेक तज्ञ व नावाजलेले चित्रकार वाई येथे कलासंपादक म्हणून येऊ लागले . 
        प्रसिद्ध चित्रकार व जेजे स्कूल ऑफ मुंबईचे डिन असलेले ज . द . गोंधळेकर वाईच्या  विश्वकोषात काही वर्षांसाठी आले होते . त्यांनी गणपती घाट , मधलीआळी घाट , मेणवली घाट येथे पेनने व जलरंगात चित्रे काढलेली आहेत .
          विश्वकोषासाठी विशेष नोंदी करण्यासाठी आलेले चित्रकार सुहास बहुळकर  तर वाईच्या प्रेमातच पडले . त्याचे सुंदर वर्णन त्यांनी वाई कलासंस्कृती या पुस्तकात केले आहे . पेशवेकालीन पुण्याचे वास्तुवैभव , महिरपी खिडक्या , वाडयांचे दरवाजे , चौकटी , कोनाडे हे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत . या विषयांची प्रेरणा घेऊन आकारसंस्कृती नावाचे त्यांनी केलेले प्रदर्शन खूप गाजले आहे .
          वाईच्या घाटाची तर अनेकांनी चित्रे काढलेली आहेत त्यापैकी ना. श्री . बेन्द्रे यांच्या आत्मचरित्रात वाईच्या घाटाचे पेनने चित्र रेखाटलेले पाहता येते . वि .मा . बाचल मूळचे वाईचे . काही वर्ष त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे . त्यांनी काढलेली रेखाटने व घाटाची चित्रे फर्ग्युसनच्या शताब्दी स्मरणिकेत पाहायला मिळतात .
          वाईचे सु .पि .अष्टपुत्रे सर व गजानन वंजारी सर हे दोघेही वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये कलाशिक्षक होते . त्यांना ज्यावेळी वेळ मिळत असे तेव्हा ते गणपती घाटावर चित्रे काढायला यायचे . अष्टपुत्रेसर अपारदर्शक कलर्स म्हणजे पोस्टर कलरमध्ये व वंजारीसर तैलरंगमध्ये निसर्गचित्रे रेखाटतात . मूळचे पसरणी गावाचे पण सध्या इंग्लडमध्ये वास्तव्य असणारे तुषार साबळे यांनीही वाई घाटपरिसरातील , मेणवली घाटाची चित्रे रेखाटली आहेत .
        सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांडरे , चित्रकार पी एस कांबळे , दिवाकर प्रभाकर, या जुन्या पिढीतील कलावतांनी वाईची चित्रे साकारलेली आहेत . बाळासाहेब कोलार , श्रीमंत होनराव (वाई) , यांच्या बरोबरच मिलींद मुळीक , संजय देसाई , शलैश मेश्राम , कविता साळुंखे , दिवगंत सचीन नाईक , कुडलय्या हिरेमठ (पुणे) , प्रफुल्ल सावंत , सागर गायकवाड (सातारा ) , संदीप यादव ( पुणे), अमोल पवार , निशिकांत पलांडे (मुंबई ), गणेश कोकरे (सातारा) विजयराज बोधनकर (ठाणे ) सुनील काळे अशा नव्या दमाच्या चित्रकारांनी वाई परिसरातील अनेक चित्रे काढलेली आहेत .
            एडवर्ड लियर या ब्रिटीश चित्रकाराने वाईच्या घाटाचे केलेले सुरेख  रेखाटन अरुण टिकेकर यांच्या ' स्थलकाल ' या पुस्तकात पाहायला मिळते . त्याचबरोबर जॉन फेड्रीक लिस्टर 1871 याने एलफिस्टन पॉईंटची व्हॅली रंगवलेली आहे . तर 1850 साली विल्यम कारपेंटर या चित्रकाराने प्रतापगडाचे विहंगम दृश्य रंगवल्याचे गुगलसर्च केल्यावर सापडले . एम.के . परांडेकर यांनी रेखाटलेल्या ऑर्थरसीट पॉईंटचे चित्र खूप प्रसिद्ध आहे . त्याचबरोबर अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत श्री . दिवाकर डेंगळे यांनीही पांचगणी वाई महाबळेश्वर येथील चित्रे जलरंगात रेखाटलेली आहेत .
           प्रसिद्ध चित्रकार जहाँगीर साबावाला याचां महाबळेश्वरमध्ये बालचेस्टर नावाचा बंगला आहे . त्यामुळे त्यांनी महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांच्या अमूर्त शैलीत ऑईलकलर मध्ये साकारले आहे . नाशिकचे शिवाजी तुपे यांनी घोड्यांचे पार्कींग असलेले इमारतीचे चित्र काढले आहे तर रवि परांजपे यांनी प्रसिद्ध पंचगंगेच्या मंदिराचे प्रवेशद्वार त्यांच्या शैलीत रेखाटले आहे .वासुदेव कामत यांनीही या परिसरात चित्रांकन केलेले आहे .
         मेणवली घाट , धोमचे नरसिंहाचे मंदीर , गणपती घाट , गंगापुरी घाट , मधलीआळी घाट , भीमकुंडआळीचा घाट , असा घाटांचा परिसर व मंदिराचे गाव म्हणून जरी वाई प्रसिद्ध असले तरी या घाटांच्या आजूबाजूला वाढलेले स्टॉल्स , टपऱ्या , दुकाने , कातकऱ्यांच्या वस्त्या , स्थानिक नगरपालीकेचे व सर्व घरांचे नदीपात्रात सोडण्यात येत असलेले दुषित सांडपाणी उघडपणे कृष्णा नदीत राजेरोसपणे सोडले जाते . त्यामुळे ट्रॅफिकची प्रचंड वर्दळ , गोंगाट , उघडी नागडी नदीत अंघोळ करणारी माणसे, भांडीकुडी कपडे धुणारी व हागणदारी करत नदीशेजारीच झोपड्यात राहणारी माणसे प्रदुर्षण करतात . मंदिराशेजारची वाढणारी गलीच्छ वस्ती पाहीली की चित्र काढण्याचा चित्रकाराचा मूड जाण्याचीच जास्त शक्यता असते . त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही . भंगारवाल्याच्या टपऱ्या , मेणवली जोर रस्त्यावर जाणाऱ्या जीपगाडया , छोट्या पुलावर बसणारे छोटे व्यावसायिक पाहीले की रस्त्यातून गाडया चालवणे किंब चालत जाणे एक मोठे संकट आहे . तरीही कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी व चित्रकार येथे येऊन चित्र काढत बसतात . मेणवली घाटावर लेखी परवानगी घेऊन फी देऊन फोटो व चित्र काढावे लागते . मेणवली घाटावर उतरत असताना डाव्या बाजूला जवळच स्मशानभूमीची जागा आहे व त्याशेजारी उघड्यावरची हागणदारी पाहीली की येथे पैसे देऊन चित्र का काढावे असा प्रश्न पडतो . तेथे बसून चित्र काढावे असे कधीकधी वाटत नाही .
           खूप वर्षांपूर्वी एकदा फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांच्या घरी राहण्याचा योग आला होता . त्यावेळी औंधचे कलाप्रेमी बाळासाहेब पंतनिधी महाराज यांचे तैलरंगातील २ फूट बाय ३ फूट आकारातील एक मेणवलीच्या घाटाचे चित्र पाहायला मिळाले . त्या चित्रातील वातावरण व शांतता आता कधीच अनुभवता येईल असे वाटत नाही . सगळीकडे व्यापारीकरण सुरु आहे .
         पाचगणीच्या टेबललॅन्डच्या पठारावर आता मोठी तटबंदी बांधली आहे . त्याच्या सभोवताली खाण्याच्या टपऱ्या व घोडागाडीची रेलचेल पाहीली की चित्र काढणाराच चकीत होतो . सगळीकडे हॉटेल्स व त्यांच्या जाहीरातीचे फ्लेक्स दिसतात त्यातून निसर्ग शोधावा लागतो . शिवाय अति गर्दीमुळे पर्यटकांचा त्रास असतोच . महाबळेश्वरला शनिवार रविवारी जायचे असेल तर घाटातच ट्रॅफीक जामचा अनुभव येऊन ड्रायव्हींग करताना मुंबई पुण्यासारखा इंच इंच लढवावा लागतो . प्रसिद्ध पॉईंटसवर चित्रे काढणाऱ्या चित्रकारानां परवानगी घ्यावी लागते अन्यथा तुमचे रेखाटलेले चित्र खोडणारे नतद्रष्ट येथे आहेत . नियमांचा बडगा दाखवून कलाप्रेमीनां काम करताना बंद पाडणारे हाकलून देणारे महाभाग येथे आहेत . त्यामुळे कलेविषयी सातारा जिल्हयात अनास्था भरपूर आहे .
         संपूर्ण सातारा जिल्हयात एकही कलादालन नसल्याने चित्रकारांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी कोठेही जागा नाही . कापडाच्या बांबूच्या कनाती बांधून नाटक असल्यासारखे प्रदर्शन करावे लागते . येथे अनेक व्यावसायिक मंडळी , राजकीय पुढारी , मुख्यमंत्री , आमदार ,खासदार , शिवरायांचे वशंज राजेमंडळी आहेत पण जिल्ह्यात वाई ,पाचगणी ,महाबळेश्वर , सातारा , कराड येथे कोठेही सुसज्ज चित्रप्रदर्शनासाठी कलादालन नाही आणि याची कोणाला लाज वाटत नाही . सगळ्या चित्रकारानां नाईलाजाने पुण्यामुंबईत प्रदर्शनासाठी जावे लागते . एकंदर कलेविषयी खूप लाचार अनास्था या पर्यटनस्थळी आहे . त्यामुळे प्रदर्शने भरत नाहीत , कलाप्रेमी तयार होत नाहीत व कलारसिकही नाहीत . 
        एकंदर परिस्थिती गंभीर आहे पण चित्रकार मात्र मनाने खंबीर आहेत .
         आजही चित्रकार मनापासून चित्रे रेखाटत आहेत व भावी पिढीचेही नवे चित्रकार भविष्यातही चित्रे रेखाटत राहतील कारण निसर्गाची ओढ, जुन्या स्थापत्यशैलीतील मंदीरे,घाट, सहयाद्री पर्वताच्या डोंगरांच्या दूर पसरलेल्या रांगा , भव्य सपाट टेबललॅन्डची पठारे कायम चित्रकारानां प्रेरणा देत राहणारच आहेत . चित्रकारांची ही चित्रे आणखी काही वर्षांनी इतकी महत्वाची असतील कारण जे वेगाने बदल होत आहेत त्या बदलांचे हे एक प्रकारे दस्तीकरण होत असते .निसर्गदेव सदैव दोन्ही हातांनी भरभरून देत राहणार आहे .  माणूस नावाचा प्राणी मात्र निसर्गाची वाट लावायला रोज नवी यंत्रणा राबवतो , त्याच्या कुठे तरी भलताच  ' विकास ' करण्याच्या प्रयत्नांनां मात्र लगाम घातला पाहीजे .

सुनील काळे ✍️[चित्रकार]
9423966486
Sunilkaleartist@gmail.com

वाईतील लोकमान्य आर्ट गॅलरी एक वेगळा अनुभव

वाईतील लोकमान्य आर्ट गॅलरी 
एक वेगळा अनुभव .
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         सोमवार  म्हणजे वाईकरांसाठी एक महत्वाचा दिवस असतो . कारण त्यादिवशी आठवड्याचा बाजार भरतो . हा बाजार पुर्ण गणपतीआळी , दाणेबाजार , मुख्य किसनवीर चौक ते संपूर्ण आजूबाजूच्या सर्व रस्त्यावर खूप सर्वदूर पसरलेला असतो . पूर्वी मावळे शिवाजी महाराजांच्या काळात घोड्यावरून बाजारहाट करत , तसे काही वाईकर दुचाकीवरूनच भाजीपाला खरेदी करत असतात . संपूर्ण रस्ता खचाखच गर्दीने व दुचाकी वाहनांनी ओसंडून वाहत असतो . 
      लालभडक,पिवळ्याधम्मक तर कधी शांत निळ्या रंगाच्या प्लॉस्टिकच्या छत्र्या व डोक्यावर ऊन लागू नये म्हणून याच रंगाची प्लास्टीक कापडांची बांधलेली छप्परे यांनी रस्ता गजबजून गेलेला दिसतो . 
         कलिंगडवाले , आंबेवाले , द्राक्षेवाले , भाजीवाले , फुलवाले यांनी सगळा फुटपाथ पूर्ण व्यापलेला असतो . छोट्यामोठ्या वस्तू , तेल , साबून पावडर , कुलूपवाले , भांडीवाले पासून ते नानाविध अनेक तयार कपड्यांच्या व सामानाच्या व्हरायटी घेऊन किरकोळ फिरस्ते व्यापारी बसलेले असतात .अनेक फळभाज्या घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी मंडळी ताजीतवानी भाजी घेऊन येत असल्याने व सोमवारी जरा कमी दरात मिळत असल्याने वाई परिसरातील माणसांची झुंबड उडालेली असते . 
         आमच्या लोकमान्य आर्ट गॅलरीच्या आजूबाजूला आरडाओरडा व माणसांची झुंबड पाहून मला खूप मजा वाटतेय . कारण मुंबईतील जहाँगीर व नेहरू सेंटरला फार गंभीर चेहरे घेऊन माणसे येत असतात .आपल्याला खूप खूप चित्र समजतात असे भासवणारी मंडळी पाहिली की  शांत वातावरणात  आणखी खूप गुढगंभीरता वाढत असते.
         याउलट वाईतील हे लोकमान्य वाचनालय नेमके या प्रचंड गर्दीत हमरस्त्याला आहे , त्या पुर्ण रस्त्यावर गजबजलेल्या फुटपाथवर अनेक भाजीवाले विक्रीसाठी सोमवारी  नियमित येत असतात 
        आज तर सोमवारची कमालच झाली .कारण  आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार पूर्ण माणसांनी व वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या टोपल्यात भरलेल्या भाज्यांनी भरलेले होते . सोबत एक मावशी गावठी अंडी विकत झक्कास मांडी घालून बिनधास्त मोठयाने ओरडत होती . शंभरला बारा , शंभरला बारा , 
तिचा खणखणीत आवाज ऐकून सगळ्या नजरा तिच्याकडे वळायच्या .
        एक व्यापारी लोणंदवरून ट्रक घेऊन आलेला होता . तो कलिंगडवाला प्रवेशद्वाराच्या शेजारीच बसला होता . मग आर्ट गॅलरी उघडल्यावर ही भाजी विकणारे मुद्दाम आत येऊन चित्रप्रदर्शन पहायला येऊ लागले . एक भाजीवाली मावशी गणपती मंदिराचे निसर्गचित्र  पाहून दोन्ही हात जोडून नमस्कार करू लागली . मग हळूच म्हणाली सकाळी बया लई गडबड झाली बघा , गंपतीचे दर्शनच घ्यायचे राहीले होते .आता तुमच्या चित्रात बाहेरचा कळस तरी दिसला , आता समदं मनासारखे झालं बघा. आता धंदा लई चांगला व्हईल .
           मग एका कलिंगडवाल्याने हळूच कापलेले एक अर्धे लालभडक कलिंगड पाठवले , एकाने मस्त कापून चटणी मीठ घातलेली काकडी पाठवली , थोड्यावेळाने एक काळीटोपी  घातलेला मुलगा उसाचा रस घेऊन आला . हळूहळू लोकमान्य आर्ट गॅलरीत लावलेल्या प्रदर्शनात सोमवारचा बाजार हजेरी लावून भरू लागला . 
          एक छोटा चुणचुणीत रुद्र चिपाडे नावाचा मुलगा आला . खूप वेळ चित्र बघत होता . मराठी महिलामंडळच्या शाळेत चौथी पूर्ण करून आता तो पाचवीला द्रविड हायस्कूलला जाणार आहे . त्याला आमचे प्रदर्शन खूप आवडले . आता रोज येईन म्हणाला . मग त्याला विचारले त्याचे आईबाबा काय करतात ? तर म्हणाला ते दोघे ताजी फुले आणून पाटी घेऊन बाजारात विकत बसतात . म्हणून त्याला स्वातीची फुलांची चित्रे  खूप आवडली . गणपती घाटाचे सगळे अँगल त्याला पाठ आहेत कारण तो घाटाशेजारीच लहान मुलांच्या महिला मंडळाच्या शाळेत जात होता. चित्र कसे काढले ? कोठून काढले ? केव्हा काढले ? त्यावेळी वातावरण कसे होते  ते तो नेमके सांगत होता . त्याचे प्रश्न संपतच नव्हते .
           आता वाटते बरं झाले आपण असे छोट्या गावात प्रदर्शन भरवले . असे अनेक छोटे मित्र , भाजीवाले , व्यापारी मित्र , ऊसाचा रस पाठवून माणुसकी जपणारे रस्त्यावरचे दुकानदार ,छोटा रुद्र व अनेक वाईकर यांची भेट कशी झाली असती ?
         मध्यमवर्गीय आईबाप भाज्यांची पिशव्या घेऊन व सोबत त्यांची छोटी मुले घेऊन चित्र पाहायला येत आहेत . हळूहळू चित्र काय असते ? प्रदर्शन म्हणजे काय ? पेपर कोणता ? फ्रेम कोठून आणली ? रंग कोणते वापरता ? असे नानाविध प्रश्न विचारत आहेत . त्याच्यां प्रश्नानां उत्तरे देताना मी देखील आता  एन्जॉय करतोय .
         आमच्या काळात चित्रप्रदर्शन पाहायला न मिळल्याचे खरोखर दुःख होत आहे . अशी छोटया तालुक्याच्या गावानां चित्रकारांनी प्रदर्शने भरवली पाहिजेत . कदाचित नव्या पिढीतील भावी कलाकार नक्की घडण्यास मदत होईल . अर्थात त्यासाठी चित्रातून फक्त अर्थप्राप्ती होईल हा विचार व अपेक्षा सोडून ग्राऊंड लेव्हलला यावे लागेल . निरपेक्ष भाव ठेऊन प्रदर्शने करावी लागतील .
        अशा अनेक छोट्या व हौशी कलाकारांची भेट नवी उभारी देते . "गावरान तडका " ही अतिशय समर्पक उपमा आहे . इथे डोक्यावर टोपल्या घेऊन भाजीवाले , अंडीवाले , आंबेवाले नाना प्रकारची माणसे येतात . त्यानां काय विचारायच्या आत पाटी टेबलावर ठेवतात व मस्त निर्व्याज ,निरागस , उत्सुकतेने चित्रे पाहतात . स्वच्छ मनापासून हसतात , दाद देतात . निवांत बसतात .चित्रे आवडल्याचे सांगतात . आनंदाने नाव्हून जातात . मुंबईत लई टेन्शन 😀😀 लई धावत्यात 😀😀 सारखी घाईत असल्याने पळत असतात इकडून तिकडे😀😀 इथे मात्र खुर्चीवर बसून गप्पा मारत अर्धा ते एक तास बसतात . मुक्त टेन्शन फ्री चित्रविचारमंथन चालते . त्यांचा परिसर चित्रातून पाहताना ते आचंबित होतात भारावून जातात . त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , काही तरी नवीन पाहील्याचे समाधान मिळते व खऱ्या अर्थाने चित्रप्रदर्शनाची आतुरता लक्षात येते .
          वाईतील यावर्षी सुरु झालेली  2024 ची वसंत व्याखानमाला खूप सुंदर व नियोजनबद्द आहे . खूप भारी भारी वक्ते येतात . त्यांची भाषणे ऐकणे हा अवर्णनीय अनुभव असतो . त्यांच्या आवडत्या विषयावर ते बोलतात पण आपल्या ज्ञानात खूप भर पडते . त्यासाठी खूप मोठा लेख लिहावा लागणार आहे . 
        सर्वांनी भेट द्यायलाच पाहीजे अशी व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल लो . टिळक ग्रंथालय संयोजकाचे व संचालक मंडळाचे आभार मानावे तितके कमीच आहे .

व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स
वाई ,पाचगणी , महाबळेश्वर येथील स्वाती व सुनील काळे यांच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाला सर्व कलारसिकांनी नक्की भेट द्या .
लोकमान्य आर्ट गॅलरी
लो .टिळक ग्रंथालय . गणपती आळी वाई .
1 ते 21 मे 2024
रोज सकाळी 10 ते 12  संध्याकाळी 5 ते 7
सर्वांना सस्नेह निमंत्रण 🙏🙏

सुनील काळे✍️
9423966486

सोमवार, १३ मे, २०२४

दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योद्धा - विश्वास बर्गे

दत्त दिगंबर पतसंस्थेविरुद्ध लढणारा अखेरचा योध्दा विश्वास बर्गे
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
        काल वाईमध्ये वसंतमाला व्याख्यानमालेतील 12 व्या पुष्पाचे व्याखाते होते श्री . समीर नेसरीकर , आणि त्यांचा विषय होता "आजच्या काळातील अर्थभान " .
       आपण सगळेच जाणतो की मनुष्य छोटा असो वा मोठा प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते . कष्टाने मिळवलेल्या पैशांचे योग्य नियोजन करायचे असते .कधीकधी आपण जसे जीवन जगायचे ठरवलेले असते , जी स्वप्ने पाहीलेली असतात त्याच्या बरोबर विरुद्ध अनपेक्षित घटना आपल्या आयुष्यात अचानक घडतात आणि ठरवलेले सुंदर जगण्याचे स्वप्न बेचिराख होते . काही जण कसेबसे सावरतात तर काही जण जीवनाशी तडजोड करून कायमची माघार स्विकारतात . अयशस्वी होतात .
         दहा वर्षांपूर्वी पाचगणीवरून वाईला कायमचे राहायला आलो . वाई पाचगणी अंतर जरी जास्त नसले तरी येथे सांस्कृतिक विषमता खूप आहे त्यामुळे फार जणांशी ओळखी घरोब्याचे सबंध नव्हते . त्यामुळे वाई परिसर व माणसे जरा नव्यानेच समजून घेत होतो .
         तयार घर घ्यायचे असे ठरवले होते तर एक भयानक अनुभव माझ्या पदरात पडला मग शेवटी घर बांधायला लागले . आता घर बांधायचे तर दोन वर्षांचा काळ जाणार होता . भाड्याच्या घरात रोख पैसे ठेवणे सोपे व सुरक्षितही नव्हते . कॉन्ट्रॅक्टरचे कामगार , त्यांची रोजची हजेरी व विटा ,वाळू , सिमेंट , यांचे पैसे महिन्याच्या एक तारखेला रोख द्यावे लागत होते . म्हणून मी काही अमाऊंट पाचगणीच्या बँकेत ठेवण्यापेक्षा दत्तदिगंबर पतसंस्थेच्या वाईच्या मिलिंद खामकर यांच्या जागेत सुरु असलेल्या शाखेत ठेवायला गेलो ,तेथे संस्थेत योगिता चौधरी या मेणवली गावच्या ओळखीच्या बाई काम करत होत्या . त्या म्हणाल्या काही काळजी करू नका . मी तुम्हाला ओळखते व मी येथे वाईतच राहते .
          घर बांधण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार होता काही दिवसांचाच तर प्रश्न होता म्हणून तेथे चार लाख रुपयांची मासिक ठेव गुंतवणूक केली . मला दर महिन्याला चार हजार रुपये मिळत होते . इकडे इमारतीच्या बांधकामाचा स्पीडही फास्ट होता . अगदी शेवटच्या थोड्याच दिवसात एक दिवस पतसंस्थेत गेलो तर शटर डाऊन दिसले .
           योगिता चौधरी मॅडमला फोन केला तर म्हणाल्या मुख्य बाजारात पहिल्या मजल्यावर मोठे ऑफीस घेतले आहे तेथे फर्निचरचे काम सुरु आहे . मी आता शाखाप्रमुख असणार आहे . फर्निचरचे काम संपले की पतसंस्था पुन्हा सुरु होईल . काळजी करू नका . मग प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व नंतर सतत पाहणी करतच राहीलो . कारण फर्निचरचे काम संपतच नव्हते . इकडे घराचे बांधकाम संपून रंगकाम सुरु झाले होते .  शिफ्टींगमध्ये खूप व्यस्त झालो होतो . शेवटी कलरकामाचे पैसे द्यायचे म्हणून एक दिवस पतसंस्थेत गेलो तर कळाले शाखा कधीच सुरु होणार नाही .
          योगिता चौधरी मॅडम म्हणाल्या मलाच फसवले , माझाच पगार दिला नाही . ज्यांच्या विश्वासावर ठेव ठेवली त्यांनी कळवलेच नाही . शेवटी एकप्रकारे दगा दिला . मग पळापळी सुरु झाली . त्यांनी विलास शिंदे नावाच्या व्यवस्थापकाची भेट करून दिली . त्यांनी सहा महिन्यात पूर्ण रक्कम मिळेल असा पोलीसांसमोर जबाब दिला .
        आयुष्यात पहिल्यांदा कोरेगावला गेलो . पो.स्टेशनला तक्रार करायला गेलो तर म्हणाले घटना वाईत घडली मग वाईत जावा . वाई पो .स्टेशनला गेलो तर म्हणाले आर्थिक गुन्हे शाखा सातारा व अंतर्गत दुय्यम सहकारी निबंधकाकडे तक्रार करा . तेथे गेल्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात अर्ज करा तेथे गेलो तर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अर्ज करा सगळीकडे नुसती टोलवाटोलवी सुरु झाली . मग वाई , सातारा , कोरेगाव अशा वाऱ्या सुरु झाल्या . अर्जांवर वर अर्ज सुरु झाले व चार लाख बुडवून घेतल्याचे दुःख व 
" अर्थभान '' पदरात पडले .
            असा संघर्ष सुरु असताना एक दिवस विश्वास बर्गे यांचा फोन आला . तुम्ही सातारा येथे भेटायला या , माझेही पैसे बुडाले आहेत आपण एकत्र प्रयत्न करू म्हणाले . मग पहिल्यांदा त्यानां भेटलो आणि आम्ही दोघेही समदुःखी आहोत याची ओळख पटली .
       विश्वास बर्गे मुंबईला माझगावच्या प्रसिद्ध इंग्रजी शाळेत पीटीचे शिक्षक होते . आयुष्यभर कष्ट करून 36 वर्षांची पेन्शन घेऊन आता कोरेगावला मूळ गावी राहून म्हातारपण निवांत जगायचे त्यांचे स्वप्न होते . एकूलती एक मुलगी सांगलीला लग्न झाल्याने दोघे पती पत्नी कोरेगावला एकटेच राहत होते . तेथे दत्त दिगंबर शाखेची मोती चौकात मुख्य शाखा होती . आयुष्यभर कमावलेले अकरा लाखाची ठेव त्यांनी पतसंस्थेत गुंतवली . त्यांनी ठेव ठेवली म्हणून त्यांच्या सर्व भावांनी पतसंस्थेत पैसे गुंतवले . एकूण चाळीस लाखापर्यंत ही रक्कम ठेवली गेली होती . आणि अचानक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र हिरालाल गांधी व त्यांचे सर्व संचालक सदस्य एकूण 32 कोटी रुपयांचा अपहार करून फरारी झाले .
        विश्वास बर्गे एक वयस्कर गृहस्थ असले तरी मुंबईत राहात होते . अभ्यासू व्यक्तिमत्व होते .धडाडीने त्यांनी सर्व ठिकाणी माझ्यासारखेच असंख्य अर्ज दिले होते . शेवटी कोरेगाव कोर्टात अर्ज करून त्यांनी फरारी सदस्यांचे पितळ उघडे पाडले . आरोपी कोरेगावचे रहिवासी होते पण पोलीसांनी त्यानां अटक केली नाही . कोरेगाव कोर्टाने त्यांनां सर्वांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला . पण लढाई इतकी सोपी नव्हती . आरोपींनी सातारा येथे अटक होऊ नये म्हणून अर्ज केला . तो फेटाळला म्हणुन मुंबई हायकोर्टात अपिल केले . मुंबई हायकोर्टाने अपिल फेटाळले म्हणून दिल्लीला सुप्रीम कोर्टात अपिल केले . या सर्व केसेस एकटे जीवाचे रान करून हाताळण्यामध्ये मुख्य योध्दा होते कोरेगावचे विश्वास बर्गे .
           या लढाई दरम्यान सातारचे मनसेचे संदीप मोझर यांनी ही संस्था चालवायला घेतल्याचे कळाले . त्यांनी या संस्थेचे दिव्य दत्त दिगंबर पतसंस्था असे नामकरण केले .मग त्यांच्या भारदस्त " किल्ला " नावाच्या बंगल्यात भेटायला गेलो . तेथे बरीच बाचाबाची ,भांडाभाडी , उलटेपालटे प्रश्न-उत्तरे झाली शेवटी त्यांचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यानां भेटायला शिवाजी पार्क मुंबईला गेलो . तेथे राजगडाचा अजब कारभाराची झलक पाहायला मिळाली . कार्यकर्त्यांनी त्यांना आता भेटता येणार नाही असे चांगल्या मराठी भाषेत सांगितले . एक अर्ज द्यायला सांगितले . त्याचे पुढे काय झाले हा संशोधनाचा विषय आहे . त्यांच्या ऑफीसमध्ये हसणाऱ्या राज साहेबांचे एक सुंदर पेन्सिल स्केच चित्रकार वासुदेव कामत सरांनी केले आहे . ते माझे अर्थभान पाहून मला हसत आहेत असा मला भास झाला . तेथून आल्यावर आणखी फोनाफोनी टोलवाटोलवी झाली . राजसाहेबांची भेट तर झाली नाही पण मुंबईचा प्रवास व जाणेयेणे भारी पडले. मग तेथूनच मोझरानां फोन केला व काही दिवसानंतर त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक दिला . थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेऊन पतसंस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला .
          सुप्रीम कोर्टाने आरोपींना अटक करून सर्वांचे पैसे परत द्यावेत असा आदेश दिला परंतू चतूर पोलीस सांगत होते आरोपी सापडत नाहीत . कोरेगावात बिनधास्तपणे फिरणाऱ्या या मंडळीना सगळेजण बघत होते पण फक्त पोलीसानां ते दिसत नव्हते .
        मी कोरेगावला ,सातारला एसपी ऑफीस व वाईत सर्व ठिकाणी अर्ज केले होते त्याची परिणीती म्हणजे एक दिवस मला वाई पो .स्टेशन येथून फोन आला म्हणाले मी यादव पोलीस बोलतोय , तुमचे मुख्य आरोपी राजेन्द्र हिरालाल गांधी येथे आले आहेत . तेथे गेलो तर गांधीसाहेब निवांत गप्पा मारत बसले होते . यादवांना मी म्हणालो यानां ताबडतोब अटक करा हे फरारी आहेत .तर ते हसत म्हणाले मी त्यांच्याकडून जबाब लिहून घेतला आहे .तुमचे सगळेच साडेतीन लाख रुपये  ते द्यायला तयार आहेत तुम्ही काळजी करू नका . मग वाईचे पो. प्रमुख आनंद खोबरे यांना भेटलो त्यानां मुंबई हायकोर्टाची प्रत दिली व अटक करा असे सांगितले तर ते म्हणाले त्यांना अटक करता येणार नाही कारण तुमचे पैसे ते देत आहेत त्यांनी लेखी जबाबाचे आश्वासन दिले . त्या लेखी आश्वासनाची प्रत घेऊन मी सगळीकडे फिरलो व फिरतच राहीलो . सद रक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे काय ते कळाले .
              फॉर्चुनर या मोठ्या अलिशान गाडीत फिरणारे राजेन्द्र गांधी एक लबाड , मवाली माणूस आहेत .  त्यांनी वाईच्या मिलिंद खामकरांच्या घरी मला नेले फुकटचे चहापाणी करून मी आता यांनां सर्व रक्कम देणार असल्याचे सांगितले. मिलींद खामकरांनी लगेच  साक्षीदार आहे असा होकार दिला .
          दुसऱ्यादिवशी सकाळी १० वाजताच कोरेगावला गेलो . तेथे ऑफिसमध्ये राजेन्द्र गांधी आलेच नाहीत . शेवटी परत बाचाबाची , भांडणे मग त्यांच्या घरातून पन्नास हजाराचा चेक आला . चार लाखापैकी एक लाख मिळाले . 
           उरलेल्या तीन लाखांसाठी आजपर्यंत वाई पो .स्टेशन ,कोरेगाव पो . स्टेशन , मा . मुख्य अधिक्षक मुख्यालय सातारा , आर्थिक गुन्हे शाखा , ग्रामविकास मंत्री , सहकार मंत्री , खासदार उदयनराजे भोसले , आमदार मकरंद पाटील , पो. उपविभागीय अधिकारी वाई , मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , महसूल मंत्री , कोल्हापूर परिक्षेत्र पो .प्रमुख , सभापती विधानपरिषद , जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग - १ सहकारी संस्था , अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी  व अर्ज करून थकलो . 
            2020 मध्ये माझ्या घराच्या पाण्याच्या टाकीवरून मी पडलो डाव्या पायाचे मुख्य हाड तुटले हॉस्पीटलचा खर्च एक लाख पन्नास हजार रुपये होता . करोनाच्या काळात पुण्यात हॉस्पीटलमध्ये ॲडमिट होतो खर्च दोन लाख होता त्यावेळी राजेन्द्र गांधी यांना अनेक फोन केले , गयावया करून माझ्याच पैशांची मागणी केली तर म्हणाले मी फक्त पाचशे रुपये पाठवतो . तीन लाखाची ठेव व पाचशे रुपये देत असल्याचे दाखवून उपकारकर्त्याची भावना ठेऊन बोलत होते . अशी माणसे वृत्तीने पोहचलेली ,निलाजरी व नालायक असतात . 
           मी पूर्णवेळ चित्रकार आहे .चित्रकारांना एक तर नियमित दरमहिना उत्पन्न नसते . कित्येक महिने चित्र काढायची व नंतर मुंबईला जाऊन चित्रप्रदर्शन करायचे . त्यातून मिळणाऱ्या मिळकतीत पुढचे चारपाच वर्ष बचत करत  जगायचे . अशावेळी तीन लाख ही डोंगराएवढी अमाऊंट असते . अशावेळी ती चित्रे डोळ्यापुढे येतात ज्यातून पैसे निर्माण झाले . सगळी मेहनत वाया गेल्याचे फिलींग जाम त्रासदायक असते . संघर्ष त्रासदायक होतो .
        या सगळ्या संघर्षात कोरेगावात त्याच्यांविरुद्ध एक माणूस खूप जिद्दीने लढत होता आणि तो म्हणजे श्री .विश्वास बर्गे .
       वयाच्या सत्तरीत असणाऱ्या या माणसाला मधुमेह होता . वजन जास्त असल्याने चालता येत नव्हते . वेदना होत होत्या .पायाची , हाताची इतर अनेक दुखणी अंगावर घेऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले . आरोपीनां रितसर अटक झाली थोड्याच दिवसात न्यायालयात जामीन मिळवून मंडळी परत बिनधास्त झाली . अधूनमधून आम्ही दोघे भेटायचो . आपल्या देशात न्याय कधी मिळणार ? पतसंस्था , स्थानिक सहकारी संस्था , त्यांचे अधिकारी काय करतात ? पतसंस्थावर निर्बंध का नसतात ? मुळात पतसंस्था कशासाठी काढल्या ? त्यानां जबाबदार कोण ? त्याच्यां कारभारावर अंकूश का नाही ? सरकारच्या या अजब कारभाराची नेहमी चर्चा करायचो . आपण हरायचे नाही , शेवटपर्यंत लढत राहायचे , या सर्व प्रतिकूल कठिण परिस्थितीला सामोरे जायचे असे ते सतत म्हणत . सातत्याने कोठेतरी अर्ज करायचे . सगळ्या अधिकाऱ्यानां भेटत राहायचे . त्यांच्या कामकाजात काय प्रगती झाली त्याचे मेसेजेस व फोन करत असायचे .
        वाईच्या लो.टिळक ग्रंथालयात माझे व्हॅली आणि फ्लॉवर्स या शीषर्काखाली सुंदर प्रदर्शन सुरु आहे . त्या प्रदर्शनाच्या तयारीत मी पूर्ण मग्न झालो होतो .
           माझ्या प्रदर्शनाची व आजचे व्याखाते समीर नेसरीकर यांचे 
"आजचे अर्थभान " ह्या व्याखानाची माहिती देण्यासाठी विश्वास बर्गे यांना मी मेसेज पाठवत होतो तर  प्रोफाईलवर त्यांचा फोटो होता व त्याखाली मेसेज होता 

 " भावपूर्ण श्रध्दाजंली "

          आजचे व्याखान कायम लक्षात राहील . तुमच्याकडे कमावलेल्या पैशांचे गुंतवणूकीचे अर्थभान नसेल तर आयुष्यात मनमुराद स्वच्छन्दीपणे जगण्याची गोची होती . आता ज्यावेळी मी घरातील दत्तदिंगबर या पतसंस्थेच्या आर्थिक फसवणूकीची फाईल उघडतो , त्यातील असंख्यं अर्ज पाहतो , त्या मुदत ठेवींच्या मूळ छोट्या आकारातील तीन लाखाच्या तीन कागदी पावत्या पाहतो त्यावेळी मी निराश होतो . मला ती रक्कम मिळविण्यासाठी कोणापुढे दाद मागावी हे कळत नाही .     
        लोकसभेच्या इलेक्शनसाठी मतदान करताना माझे हात थरथरतात . ही काळी शाई लावून आपण जीवनातील आनंदाला डाग लावून घेतल्याचे शिक्कामोर्तब होते . कोणी तरी मेसेज त्या काळात पाठवला होता " डाग अच्छे होते है " .
       या देशात हजारो कोटी रुपयांचा अपहार करून विजय मल्ल्या इंग्लडमध्ये मजेत ,निवांत ,आनंदाने जगत असतो . ललीत मोदी परदेशात चैन करत असतो . कित्येक दिवस झाले या महाभागानां अटक होत नाही . कायद्याचा किस काढला जातो . त्याचीच प्रेरणा हे दत्त दिगंबर पतसंस्थेसारख्या काही सहकारी संस्था घेत असतात . त्यानां अनेक अज्ञात हातांचा आधार असतो त्यामुळे कसलीही भीती वाटत नाही . सर्वसामान्य भाजीवाले , फळविक्रेते , छोट्या पानपट्टीसारख्या दुकानदारांनी रोज साठवलेली छोटी ठेव या पतसंस्थेत जमा केली होती . पण गरीबांचे , कष्टकऱ्यांचे कष्टाने घाम गाळून जमवलेले पैसे हे संचालक गडप करतात . कित्येक कोटी रुपयांनां चुना लावून मजेत जगत असतात . अलिशान फॉर्चुनरमधून फिरत असतात . सक्षम पोलीस यंत्रणा , मोठमोठे राजकीय नेते , सामाजिक पुढारी , समाजसेवक त्यांच्यापुढे नांगी टाकतात ,त्यावेळी आपली भारताची लोकशाही काळ्या रंगाची चादर लपेटून गुपचूप अंधारात बसलेली आहे असे मला वाटते . 
      आता चार जून रोजी निवडणूकीचा निकाल लागेल नवीन खासदार निवडून येतील  दिल्लीला जातील एकमेकांच्या विरोधकांवर टिकास्त्र करून लोकशाहीचा जयजयकार करतील . सामान्य माणसांच्या परिस्थितीत काय फरक पडेल ? कधी कधी वाटते न्याय मिळविण्याच्या प्रोसेस इतक्या कॉम्प्लीकेटेट ( गुंतागुंतीच्या)केलेल्या आहेत की न्याय मिळेपर्यंत माझ्या फोटोलाही " भावपूर्ण श्रध्दांजली " म्हणत हार घालावा लागेल की काय ?असे वाटते .
अशा लढाईत विश्वास बर्गे सारखा एक खरा सच्चा योध्दा धारातिर्थी पडला हे पाहून आठवणीने डोळे पाणावले . बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे बर्गे सर लढा देत  कायमचे गेले .आता त्यांची एकटी अशिक्षित पत्नी हा लढा कसा पुढे चालू ठेवणार ? तिच्या जगण्याचे भवितव्य काय ? कोण तिला सावरणार ? एकंदर पुढे सगळं अवघड आहे . तिच्यापुढे अंधारयात्रेचा मोठा प्रवास आहे . हा अवघड प्रवास सर्वानां कळावा , त्यांनी यातून काही बोध घ्यावा म्हणून हा लेखनप्रपंच 🙏🙏

आता पैसे बुडविणारे राजेन्द्र गांधी व संचालक मंडळ फटाके फोडून मोठ्याने डिजे वाजवत असतील कारण आता केसेस लढणारा व बाजीप्रभू सारखा लढणारा लढवय्या बर्गे सर गेले . आता त्यांची मजाच मजा . आपल्याला कोणी वाली नाही हेच खरे . 🙏🙏

जय महाराष्ट्र ,🙏 जय भारत , 🙏
जय लोकशाही 🙏व जय आर्थिक अर्थभान !
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सुनील काळे✍️
9423966486

शनिवार, ११ मे, २०२४

ग्रीन टाय (हिंदी)

*" ग्रीन टाय "* 
⚜️⚜️⚜️⚜️
           मनुष्य जीवन बड़ा ही विचित्र होता है।कई अकल्पित, नवीनता से भरी, रोमांचकारी, सुखमयी और दुखदायी घटनाएँ प्रत्येक व्यक्ति के जीवन में घटित होती रहती हैं और उसकी विशेषता है कि हर एक का जीवन, दैनिक गतिविधियाॅं भिन्न-भिन्न होती हैं। दो भिन्न व्यक्तियों का जीवन एक- सा कभी नहीं होता।
      जीवन में कभी- कभी दुखद घटनाओं का ऐसा नित्यक्रम आरंभ होता है ,जो थमने का नाम ही नहीं लेता। ऐसे में ऊपर से कठोर दिखने वाला मनुष्य भी निराशा की गहराई में धॅंसता चला जाता है। कुछ लोग अपनी निराशा, अपनी उदासी छिपाकर ऊपर से तो वीरता का भाव दिखाते रहते हैं,परंतु अंदर ही अंदर आँधी के थपेड़े से गिरे किसी पेड़ की भाँति टूट चुके होते हैं। ऐसा प्रसंग हर एक के जीवन में कभी न कभी आता ही है कि तब उसे लगता है कि बस!अब बहुत हो चुका!अब जीवन में रखा ही क्या है ? अब जीवन जीने का प्रयोजन ही क्या है? वैसे तो ऐसे मनुष्य इस बात को स्वीकार नहीं करते, परंतु अंदर ही अंदर वे दुखद घटनाएं,दुखद प्रसंग, उनका स्मरण, तथा उनकी आँच मनुष्य के मन को जलाती रहती है।ये घटनाएं मन की गहराइयों में पैठ जाती हैं। 
        सन 1995 में मैंने मुंबई के जहांगीर आर्ट गैलरी में एक चित्र प्रदर्शनी आयोजित की थी। यह प्रदर्शनी सभी पहलुओं पर खरी उतरी थी।विशेषत: आर्थिक रूप से यह प्रदर्शनी अत्यंत सफल रही थी। उन दिनों मैं नालासोपारा में रहता था और 'केमोल्ड' नामक एक कंपनी में नौकरी किया करता था। मेरा काम कंपनी के फ्रेमिंग डिपार्टमेंट में होने के कारण मुझे लोअर परेल,प्रिंसेस स्ट्रीट, वसई तथा जहांगीर आर्ट गैलरी इन इलाकों में हर दिन जाना पड़ता था। प्रातः 7:00 बजे से लेकर रात्रि 11:00 बजे तक काम करके थका- हारा मैं घर आता था। यह मेरा नित्य दिनक्रम बन चुका था। तथा इसी दिनक्रम को और लोकल की उस जानलेवा भीड़ को सहना अब मेरे लिए कठिन हो चुका था। मेरे मन में एक ही भाव बार-बार उमड़ता रहता था कि मैं यहाॅं हर दिन जी नहीं रहा हूॅं, बल्कि प्रतिदिन मर रहा हूॅं।               
          मुझे हमेशा से ही पंचगनी- महाबलेश्वर की प्रकृति, वहाॅं का प्राकृतिक सौंदर्य अपनी ओर आकर्षित करता रहा था।इसलिए मैंने अपने पैतृक गांव वापस जाने का निर्णय लिया।पंचगनी में मुझे अपने चित्रों के विक्रय के लिए आर्ट गैलरी तैयार करनी थी।इसी उद्देश्य की पूर्ति के लिए मैं दिन-रात बेचैन रहता था।इसके लिए मैं हर संभव प्रयास कर रहा था।आखिरकार मेरी लगन  रंग लाई और मुझे सिडनी पाॅईंट के पास एक पुराना बंगला किराए पर मिल गया।उस पुराने बंगले को आर्ट गैलरी का रूप देते -देते मेरे पैसे कब और कैसे हवा हुए, मुझे पता ही नहीं चला।फिर भी अपनी जिद पूरी करते हुए मैंने आर्ट गैलरी बनाई। सौभाग्य से सभी पर्यटक तथा स्थानीय निवासी दोनों ने उसकी अच्छी सराहना की। परंतु 1 साल पूरा होने से पहले ही मकान मालिक ने धोखा दिया और मकान खाली करने के लिए कहा। मैंने कई बार उससे विनती की, पर वह नहीं माना। तब व्यावसायिक दृष्टि से मैं पूरी तरह से टूट गया। तत्पश्चात काल ने ऐसी करवट बदली कि मेरे बुरे दिन शुरू हुए …….
      एक नई शुरुआत, नए स्थान की खोज आरंभ हुई।कभी पंचगनी क्लब, कभी टेबल लैंड की गुफा तो कभी मैप्रो गार्डन-ऐसी नई-नई जगहों पर गैलरी बनाने का प्रयास करता रहा। हर जगह नई अडचनें, नया इंटीरियर, नए प्रयोग करने पड़ते थे। हर साल जगह बदलनी पड़ती थी।उन दिनों एक बार मैंने मैप्रो गार्डन में खुले आसमान के नीचे 'प्लाजा' जैसी प्रदर्शनी लगाई थी। परंतु यहाॅं पर भी दुर्भाग्य ने मेरा पीछा नहीं छोड़ा। एक दिन मई के महीने में अचानक किसी बिन बुलाए मेहमान की तरह आसमान में बादल घूमडकर आए। जोरों की वर्षा हुई और देखते ही देखते मेरे सारे चित्र, ग्रीटिंग कार्ड ,कैलेंडर ,पोस्टर सभी कुछ तहस-नहस कर चली गई। उन चित्रों के साथ मेरी सारी मेहनत और मेरी उम्मीदों पर भी पानी फिर गया। मॅप्रो का कोई भी कर्मचारी मेरी सहायता के लिए आगे नहीं आया। एक-एक स्थान पर जाकर वहां घंटों बैठकर बनाए हुए लगभग 200 चित्र नष्ट हो गए। मॅप्रो के मालिक ने न कोई सहानुभूति जताई, न किसी प्रकार की कोई सहायता की। बल्कि उन्होंने तो मुझे धमकी दे दी कि अगर अभी-इसी समय चित्रों का यह कचरा नहीं उठाया तो उसे रास्ते पर फेंक दिया जाएगा।उन्होंने केवल धमकी नहीं दी वरन् उसे पूरा भी कर दिखाया। उस समय उन्होंने मेरी जो अवहेलना की वह मेरे मानस पटल पर सदा के लिए चिन्हित हो गई। जैसे किसी तेज चाकू से प्रहार कर मेरे मन को क्षत-विक्षतकर दिया हो।
               इतने परिश्रम से बनाए गए चित्र नष्ट होने पर तो जैसे मेरे जीवन जीने का संबल ही खत्म हो गया। रहने के लिए घर नहीं, जिंदा रहने के लिए पैसे नहीं, घर वालों का कोई आधार नहीं, ऐसी स्थिति में निराशा के अंधकार ने मुझे अपने गर्भ में दबा लिया। मन में उदासी और निराशा के काले बादलों ने मानो हमेशा के लिए बसेरा कर लिया। फिर अपना जो कुछ थोड़ा-बहुत सामान था ,वह सब उठाकर मैं फिर से मुंबई चला आया। परंतु जगह बदलने से अडचनें थोड़े ही कम होने वाली थीं?  मेरे भाग्य को शायद कुछ और ही मंजूर था। मुंबई में मैं फिर से नालासोपारा में रहने लगा।परंतु मेरे जीवन का सबसे बड़ा वज्राघात यहीं पर हुआ।मेरी इकलौती बेटी को डॉक्टर की अक्षम्य में गलती के कारण अपने प्राणों से हाथ धोने पडे। डॉक्टर के गलत इंजेक्शन ने उसकी जान ले ली। इस आघात को सहना मेरे बस की बात नहीं थी। मैं पूरी तरह टूट गया। मैं अंतर्बाह्य रूप से दहल गया।
           मेरे मन में अब जीवन की कोई लालसा नहीं रही। जहाॅ-जहाॅ भी मैं गया, सभी जगह निराशा ही मिली। मेरे अंधकार रुपी जीवन की एक मात्र प्रकाश ज्योति भी बुझ गई। ऐसे में जीवन जिए तो कैसे ? और क्यों ? किसके लिए ? ऐसा संघर्षमय जीवन और कितने वर्षों तक जिए ? इन प्रश्नों ने मेरे मन मस्तिष्क को झंझोडकर रख दिया। इस निरंतर संघर्ष से अब मैं थक चुका था। हार चुका था। इसीलिए मैंने आत्महत्या करने का निश्चय किया।मन ही मन मैंने अपना निर्णय अटल कर लिया।
           पंचगनी क्लब के ठीक सामने ही सेंट पीटर्स चर्च है।उस चर्च के पीछे एंग्लो इंडियन ख्रिश्चन लोगों की दफन भूमि है।यहां का परिवेश अत्यंत शांत एवं प्रकृति गंभीर है। पंचगनी की खोज जिस अंग्रेज अधिकारी ने की उस जॉन चेसन की कबर यहाॅं है।यह कबर वर्षो से उपेक्षित है।पता नहीं क्यों, पर आत्महत्या करने से पहले एक बार उस कबर के दर्शन कर लूं, फिर मै और मेरी पत्नी स्वाती दोनो आत्महत्या करूॅ,  यह हमने मन ही मन तय कर लिया। अपराहन 2:00 बजे लगभग मैं वहाॅ पहुॅंचा। जिस व्यक्ति ने पंचगनी की खोज की,अनगिनत फल फूलों के पेड़ लगाएं, सिल्वर ओक के पेड़ लगाएं,कॉफी, आलू,स्ट्रॉबेरी आदि की खेती शुरू की, इस भूमि पर पहला बंगला बनाया, इस परिवेश का अध्ययन कर इसे एक पर्यटन स्थल के रूप में विकसित किया,ब्रिटिश अधिकारी- कर्मचारियों के बच्चों के लिए अंग्रेजी स्कूल शुरू किए,उस महान जॉन चेसन की कबर अत्यंत उपेक्षित पड़ी है। पता नहीं कितने वर्षों से वहां की साफ सफाई न हुई हो। मैंने आस-पास की झाड़ियों को तोड़कर जगह साफ की और वहीं बैठ गया। 
          जैसे ही मैं उस कबर के सामने बैठा, पता नहीं कैसे पर मेरी अंतरात्मा को एक अजीब-सी अनुभूति हुई और मैं आंखें मूंदकर उस कबर के साथ बातचीत करने लगा। इस निर्जन स्थल पर ध्यान मग्न हो गया। मुझे मेरे आस-पास के परिवेश का कोई ध्यान नहीं रहा। कई घंटों तक मैं उसी समाधि अवस्था में वहां बैठा रहा।अचानक मेरे कंधे पर किसी हाथ का आभास हुआ और मैंने अपनी आंखें खोली। पीछे मुड़कर देखा तो मेरा मित्र आयझॅक सिंह नजर आया। आयझॅक ने मुझे प्रेमावेग से अपनी बाहों में भर लिया। मेरे आंसू पूछे, मुझे सांत्वना दी और मेरी सारी कहानी ध्यान पूर्वक सुनी।
           आयझॅक पंचगनी में कंप्यूटर सिखाता था। संगणक तथा उसके शास्त्र का संपूर्ण ज्ञान उसे था। सभी को वह प्रेम से,अपनेपन से सिखाता था। मुझे कंप्यूटर पर चित्र बनाने के लिए प्रोत्साहित करता था और चित्र बनने पर सच्चे मन से प्रशंसा भी करता था। सभी को प्यार से समझाने-सिखाने के कारण देसी विदेशी छात्र प्रसन्नता से उससे कंप्यूटर सीखते थे। वह हमेशा अपने काम में व्यस्त रहता था। उसका चलना भी मानो दौड़ना होता था। आयझॅक बहुत ही सच्चा,मजेदार और जिंदादिल इंसान था…….
          'अब मैं आत्महत्या करने जा रहा हूं'  ऐसा कहने पर उसने प्रथमत: मेरा अभिनंदन किया और बोला कितने कठिन संघर्ष से तूने चित्रकला सीखी, पंचगनी के प्राकृतिक सौंदर्य के असंख्य के चित्र बनाएं, चित्र प्रदर्शनी की। पर अपनी स्वयं की जगह न होने के कारण तुझे बहुत परेशानी , बहुत अडचनें सहनी पड़ी, इस बात का मैं गवाह हूॅ। तेरे सभी चित्र बारिश में नष्ट हो गए, आर्थिक स्थिति खराब हुई। तेरे सभी प्रश्नों के उत्तर तो मेरे पास नहीं हैं।तुझे सफलता क्यों नहीं मिली?  यह मैं नहीं बता सकता। पर तूने बहुत संघर्ष किया है, परिश्रम किया है।इसलिए तू आत्महत्या मत कर ऐसा भी मैं तुझे नहीं वह कहूंगा। मैं तुमसे एक ही विनती करता हूं कि जो कला तेरे हाथों में जीवित है, वह तेरे साथ ही खत्म हो जाएगी……..
          इसलिए तू कुछ दिनों के लिए बिलिमोरिया स्कूल में बच्चों को चित्रकला सिखा। वहाॅ कोई कला शिक्षक भी नहीं है।उन बच्चों को एलिमेंट्री और इंटरमीडिएट आदि चित्रकला की परीक्षाएं देनी है। उन्हें गुरु की आवश्यकता है। तू अगर आत्महत्या कर चला गया तो तेरी कला भी तेरे साथ ही चली जाएगी।अगर तूने तेरी यह कला किसी और को न सिखाई तो सामने दिख रहा है येशू तुझे कभी माफ नहीं करेगा…
           तू केवल एक महीने तक इन बच्चों को चित्रकला सीखा और फिर आत्महत्या कर। मैं तुझे नहीं रोकूंगा…
     पर मैंने अभी तक चित्रकला किसी को सिखाई नहीं।यह अंग्रेजी माध्यम का स्कूल है। मैंने ए.टी.डी. या ए.एम. की पदवी नहीं प्राप्त की है।ऐसे में वे लोग मुझे कैसे स्वीकार करेंगे ? यह मुझसे नहीं होगा।
    मैंने कमर्शियल आर्ट सीखा है,पर शिक्षा से मिला कभी कोई संबंध नहीं रहा है।ऐसी विनती मैंने उससे की।
आयझॅक बहुत ही हठी था। उसने अपने गले की ग्रीन टाय निकाल कर मेरे गले में डाल दी और कहने लगा- ' मिस्टर आर्टिस्ट सुनील काले, नाउ यू आर लुकिंग वेरी स्मार्ट आर्ट टीचर।' मैं तुम्हें वचन देता हूं कि तुम्हें वहाॅ किसी प्रकार की कोई तकलीफ नहीं होगी। तुम्हारा इंटरव्यू भी नहीं होगा।कोई शर्त नहीं होगी। सुबह का नाश्ता, दो समय का खाना, शाम की चाय और रहने के लिए एक कमरा मिलेगा। 
     मनुष्य को जीने के लिए और क्या चाहिए ?  रोटी, कपड़ा, मकान और एक नौकरी…..
     तुम्हें अगर यह सभी चीजें मिल रही हो तो तुम्हें इस चुनौती को स्वीकार करना चाहिए। एक महीने की तो बात है।उसके बाद तू जो आत्महत्या करने जा रहा है, उसे भी मैं विरोध नहीं करूंगा। फिर समस्या क्या है ?  इस संसार से जाने से पहले अपने सर्वोत्तम अनुभव, अपना सर्वोत्तम ज्ञान तू बच्चों को दे यही मेरी विनती है।
         थोड़ा शांति से सोचने पर मुझे उसकी बात सही लगी। अपना सर्वोत्तम ज्ञान, अपनी सर्वोत्तम कला बच्चों को दूॅगा और तभी आत्महत्या करुॅंगा, यह निश्चय मैंने कर लिया।
        दूसरे दिन सुबह बिलिमोरिया स्कूल पहुंच गया। प्रधानाचार्य साइमन सर ने मुझे नियुक्ति पत्र दिया और एक छोटे बच्चों की कक्षा में अध्यापन के लिए भेज दिया। कक्षा में प्रवेश करते ही मुझे देखकर वह छोटे-छोटे बच्चे खुशी से झूम उठे। बहुत वर्षों बाद उन्हें आर्ट टीचर मिले थे। इसलिए उनमें उत्साह भर आया और वे सभी लड़के-लड़कियां मेरे इर्द-गिर्द इकट्ठे हो गए। सभी अपने-अपने चित्र, चित्रकला की कापियां, क्रेयॉन कलर बॉक्स दिखाने लगे।बच्चों का यह उत्साह देखकर मैं भी उत्साहित हुआ और खुशी से उन्हें चित्रकला सिखाने लगा। मुझे ऐसा आभास होने लगा मानो मैं अपनी छोटी बच्ची को ही चित्रकला सिखा रहा हूॅं।
      सिखाते सिखाते 2 घंटे कैसे बीत गए मुझे पता ही नहीं चला। सायली पिसाल, आकाश दुबे,उत्सव पटेल, ताहिर अली ऐसे नाम मुझे आज भी स्मरण हैं। तब पहली तासिका के बाद दूसरी कक्षा,नए बच्चे, नई पहचान, नई जिज्ञासा वाले नए बच्चे, उनकी निश्छल भावनाएं।मुझे अंतर्मन तक छू गई। नई पहचान, नया परिचय पाने के बाद वे छोटे बच्चे-बच्चियाॅं स्कूल के बाद भी मेरे कमरे के आसपास ही घूमने लगे। उन्हें अपने नए चित्र मुझे दिखाने होते थे। फिर मैं भी उन्हें क्राफ्ट, ऑरिगामी,  चित्रों के अलग-अलग विषय, प्रकार उन्हें सिखाने लगा। नियमित रूप से उनके व्यक्तिचित्र, स्केचिंग करने लगा। मुझे काफी नए मित्र  बिलिमोरिया स्कूल में मिले। इस प्रकार एक महीना, दूसरा महीना,तीसरा महीना कैसे बीता पता ही नहीं चला।
           एक स्कूल का यह नया अपरिचित संसार मैं अनुभव कर रहा था।
यह मेरे लिए बहुत ही अलग था। स्कूल में भले ही मैं हर रोज नई-नई शर्ट पहनता था, पर मेरी टाय एक ही होती थी-
                         आयझॅक सर ने दी हुई ग्रीन टाय।
          इस प्रकार एक वर्ष बीत गया और अगले वर्ष मैंने सेंट पीटर्स नामक ब्रिटिश स्कूल में नौकरी स्वीकार की तथा मेरी पत्नी स्वाती मेरे स्थान पर बिलिमोरिया स्कूल में पढ़ाने लगी।
सेंट पीटर्स स्कूल में चित्रकला विषय को सदैव प्रोत्साहन मिलता था। बच्चे नई- नई बातें सीख रहे थे। उनके साथ मेरी भी चित्रकला नया रूप, नया साज लेकर निखर रही थी। इस नए स्कूल के परिवेश, उसके प्राकृतिक सौंदर्य एवं वास्तुकला के नए चित्र मैं बनाने लगा। इन दिनों मेरी चित्र प्रदर्शनी नेहरू सेंटर, फिर ओबराय टाॅवर होटल और 2002 में जहांगीर आर्ट गैलरी में हुई। यहां दर्शकों ने उसे खूब सराहा और चित्रों की अच्छी बिक्री हुई।
         मेरी आर्थिक स्थिति में भी सुधार आया और मैंने 2003 में एक रो-हाउस खरीदा तथा एक नए स्टूडियो का निर्माण भी किया।
         सेंट पीटर्स स्कूल में ड्रेस कोड होने के कारण मैंने कई सारे नए कपड़े खरीदे। उन दिनों मेरे पास रंग बिरंगी कुल 80 टाय जमा हो चुकी थी। आज भी यादों के रूप में मैंने उन्हें संभाल कर रखा है। परंतु उन सब में एक टाय मैंने बहुत प्यार से, लगाव व अपनेपन से संभाल कर रखी है-
वह है आयझॅक सर की दी हुई ग्रीन टाय।
         आज भी कभी मैं निराशा तथा दुख में डूबता हूॅं, तब मुझे आयझॅक की याद आती है। आजकल आयझॅक अमेरिका में रहता है और अब उसकी शादी भी हो चुकी है। फेसबुक पर कभी-कभार संपर्क हो जाता है। जीवन में कितना भी अमीर बनूं, मेरी आर्थिक स्थिति मजबूत हो या कमजोर हो-फिर भी एक चीज मैं उसे कभी वापस नहीं करूंगा और वह है उसने दी हुई ग्रीन टाय। 
           ……..क्योंकि वह ग्रीन टाय मुझे स्वयं ही कभी-कभी आयझॅक बना देती है। मुझे मिलने कई कलाकार मित्र आते रहते हैं। कुछ नवसीखिए होते हैं,कुछ निराशा में डूबे होते हैं, किसी ने सभी उम्मीदें खोई होती हैं, कुछ कला शिक्षक होते हैं। वे कई बातों की शिकायत करते हैं, दुखड़ा सुनाते हैं। उनकी कई समस्याएं होती हैं, पर उन्हें समस्याओं का समाधान नहीं मिलता। ऐसे प्रसंग में मैं काले सर के स्थान पर आइझॅक सर बन जाता हूॅं। मैं तो कहूंगा कि आयझॅक का संचार मुझमें हो जाता है।
            जब-जब ऐसे निराश, व्यथित , दुखी लोग हमें मिलते हैं तब- तब हम सभी ने, प्रत्येक व्यक्ति ने आयझॅक बनकर उनको इस निराशा, व्यथा और दुख से बाहर निकालना चाहिए, ऐसा मेरी अंतरात्मा मुझे बताती रहती है। उसकी ग्रीन टाय का स्मरण कराती रहती है।
          जीवन आत्महत्या कर समाप्त करने के लिए नहीं होता, अपितु अपने जीवन और व्यक्तित्व का सर्वोत्तम देने के लिए, सर्वोत्तम जीने के लिए,सर्वोत्तम सीखने के लिए,सर्वोत्तम सिखाने के लिए, सर्वोत्तम देखने के लिए, सर्वोत्तम सुनने के लिए, सर्वोत्तम सुनाने के लिए, जीवन के हर सर्वोत्तम पहलू को उजागर करने के लिए होता है।
         ऐसे कई आयझॅक मुझे समय-समय पर मिलते गए और मेरा जीवन समृद्ध करते गए। 21 वर्ष हुए अब इस घटना को। आत्महत्या का विचार भी अब मैं भूल चुका हूं। ऐसे कई आयझॅक हमें अलग-अलग नामों से, अलग-अलग रूपों में मिलते रहते हैं। कभी कोई मिला तो आपको भी ऐसा आयझॅक और एक ग्रीन टाय मिले। नहीं तो.....
          आप ही किसी का आयझॅक बन जाएं और उस निराश दुखियारे को एक ग्रीन टाय दें और उसके जीवन के अंधकार को सदा के लिए दूर कर दे।

            इसी कामना के साथ…...

ऐसी है मेरी ग्रीन टाय की यादें…...

मुझे सदैव प्रकाश पर्व की ओर ले जानेवाली.....


✍️सुनील काले[ चित्रकार]
9423966486.

प्रजासत्ताक दिन

स्टॅन्डर्ड
🌟🌟
मायानगरी मुंबईचे अनुभव
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
         मागच्या वर्षी प्रदर्शनाच्या वेळी मी पार्ल्याला गेलो होतो .कारण तेथे  अष्टपैलू चित्रकार , लेखक , कार्टूनिस्ट , गायक , मिमिक्रीकार , कलाशिक्षक असे बहुगुण संपन्न असणारे सी एस पंत [ चंद्रशेखर पंत] नावाच्या आमच्या मित्राने खास घरी येण्याचे निमंत्रण दिले होते . 
      चंद्रशेखर पंताचे व्यक्तीमत्व अतिशय प्रभावी आहे . झाकीर हुसेनसारखे लांब केस , मोठा काळ्या रंगाचा फ्रेमचा चष्मा , आणि कानाशेजारी खूप लांब मोठे कल्ले . त्यात आता वयामुळे केस पांढरे झालेले त्यात ते नेहमी झब्बा घालतात त्यामुळे त्यांना पाहताच हा माणूस ' कल्लाकार ' आहे हे लगेच लक्षात येते . मी मात्र साधा राहायचो . माझी पर्सनालाटी दाढी घोटून फक्त मिशा ठेवल्याने चित्रकार सोडा फार तर काय , धड कारकूनही मी शोभायचो नाही . एखाद्या कंपनीचा अंकौटंट वाटायचो . मग आपला काहीतरी बदल करून कायापालट करायचा मी ठरवले . मग दाढी वाढवली . पण माझ्या दाढीचे केस राठ असल्याने चेहऱ्यावर काटेरी गवत उगवल्याचा मलाच भास व्हायला लागला . मग मी सगळे आर्टिस्ट ठेवतात तशी बुल्गानीन दाढी ठेवली तर ओठांच्या खाली हनुवटीच्या भागावर सगळ्या भागात केसच उगवायचे नाहीत मग दोन्ही साईडला कट मारला व आताची स्टाईल केली . मग मी जरा थोडा चित्रकार दिसावा म्हणून अनेक कप्यांचे फोटोग्राफरचे जॅकेट घालायला लागलो . केस रंगवायचे पुर्ण सोडून दिले . आता मी चित्रकार दिसू लागलो . पण नुसता चित्रकार दिसून काय फायदा ? कारण चेहऱ्याने मी सुमार व्यक्तीमत्वाचा असल्याने गरीब बावळटच वाटायचो , माझी चित्रं  विकायची असतील तर जरा भारदस्तपणा वाटायचा नाही . मग एकदा पुण्याला गेलो होतो त्यावेळी अभिनव कॉलेजच्या समोर सिलाई नावाच्या दुकानातून एक जीन्सचा ब्लेझर घेऊन ठेवला . प्रदर्शनात शाईनिंग मारायला उपयोगी पडेल म्हणून आणि आता तो मी सात दिवस घालतोय .
         आता हे सगळे व्यक्तिमत्व विकासाचे पुराण का सांगतोय ? तर सविस्तर किस्साच सांगतो .
         2004 साली आमचे नेहरू सेंटरलाच प्रदर्शन होते . माणसे यायची व जायची . कोणी टाईबुट घालणारा , कोणी फॉरेनर , कोणी पारशासारखा दिसणारा , कोणी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा , कोणी गोऱ्यापान बॉबकटवाल्या स्टाईलीश लिपस्टीक लावलेल्या उच्चभ्रू बायका , किंवा ऑफीसला जाताना अपटूडेट माणूस दिसला की आम्हाला वाटायचे क्लाएंट आला , हा माणूस स्टॅन्डर्ड दिसतोय म्हणजे चित्र घेणार असे वाटायचे . आम्ही लगेच छापलेले ब्रोशर घेऊन त्याला प्रभावित करण्यासाठी ॲटेन्ड करायला धावायचो पण बऱ्याचदा तो फुसका बार निघायचा . एखादा साधा माणूस दिसला की आम्ही दुर्लक्ष करायचो . कारण चित्राच्या किमती त्याला परवडतील असे वाटायचे नाही .
           त्या प्रदर्शनात एक साधा बुशशर्ट , पायात साधी बाटाची ब्राऊन कलरची सॅन्डल व पँट घातलेली व्यक्ती आली त्याच्याबरोबर एक जाडा माणूस सोबत होता . मी त्याला ॲटेन्ड करायला उठलोच नाही . हा काय चित्र घेणार ? हा विचार मनात येऊन मी न्यूजपेपर वाचत बसलो . ते गृहस्थ शांतपणे गॅलरीत प्रत्येक चित्र पहात होते . मी निवांत बसलो होतो इतक्यात सद्गृहस्थ माझ्याकडे आले व शांतपणे म्हणाले एक्स्कूज मी , मला ह्या एका भिंतीवर लावलेली सगळी चौदा चित्र घ्यायची आहेत . कॅन यू बुक फॉर मी .
          मी त्यांच्या चेहऱ्याकडे पहात म्हणालो यु वॉन्ट फोरटीन पेंटींग्ज ? एकदम चौदा चित्र मागतोय म्हणजे काय आपली गंमत करतोय का काय ? कदाचित टाईमपाससाठी हा माणूस आला असणार . मी म्हणालो ही प्राईजलिस्ट घ्या त्याच्या किंमती बघा व त्यानंतर ठरवा . तर हे गृहस्थ म्हणाले नो प्रोब्लेम फॉर मी , व्हाटेवेअर प्राईज इज देअर आय एम रेडी टू पे . 
आता मी चक्रावलो . 
मग त्यानां सांगितले ही चौदा चित्रे घेतलीत तर एक मोठी अमाऊंट होईल प्लीज चेक द प्राइजेस . 
तर गृहस्थ म्हणाले आय टोन्ड हॅव एनी प्रॉब्लेम . मग मीच कॅल्क्युलेशन करून सांगितले या चौदा चित्रांची तीन लाख चाळीस हजार एवढी मोठी अमाऊंट आहे . तुम्हाला परवडेल का ? तर म्हणाले ओके , नो प्रोब्लेम , पुट रेड टॅग ऑन द पेंटींग्ज . 
आता माझे डोके विचित्र अनुभवाने गरागरा फिरू लागले .
 
मग मी त्यांना सांगितले मी मुंबईत राहत नाही . मी व माझी पत्नी स्वाती दोघेही पाचगणीला राहतो जर तुम्ही चित्रे बुक करत असाल तर तुम्हाला थोडे पैसे ॲडव्हान्स द्यावे लागतील . कारण तुम्ही चित्रे घ्यायला आला नाहीत तर आमचे नुकसान होईल . मग सदगृहस्थ गालात छान हसले , ओके नाऊ आय अंडरस्टुड युवर प्रॉब्लेम . आणि मग त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला काहीतरी कानात सांगितले . तो माणूस बाहेर गेला व दोनच मिनिटात प्लास्टीकच्या बॅगेत संपूर्ण रक्कम रोख घेऊन आला . सदगृहस्थानी सगळी रक्कम टेबलवर ठेवली व सांगितले आता आशा करतो की तुझे सर्व प्रश्न संपले असतील .
 मी तर भारावलेल्या अवस्थेत त्या नोटांच्या बंडलाकडे  दोन मिनिटे बघतच राहीलो . काय सुधरेनाच . इतके पैसे एकावेळी बघायची सवयच नव्हती . त्यावेळी ज्या सेंट पीटर्स शाळेत कलाशिक्षक म्हणून नोकरी करायचो . तेथे माझा दर महिन्याचा पगार सात हजार सातशे होता त्यात कंटींग होऊन जो पगार मिळायचा त्यात महिना भागवायला लागायचा . माझ्या मनात असंख्य विचार येत होते . मी जणू ट्रान्समध्ये वेगळ्या स्वप्नातच विहार करत गेलो होतो . हे सत्य आहे का स्वप्नात आहोत असे क्षणभर वाटले .
त्या सदगृहस्थानी मला स्वप्नातून भानावर आणले .
प्लीज पॅक द पेटींग्ज ,आय विल टेकिंग एव्हरीथिंग टुडे ओन्ली .
मग चित्रांचे पॅकिंग करताना मी त्यांना विचारले आपण काय करता ?
तर म्हणाले एक कंपनी चालवतो .
कसली कंपनी ? नाव काय कंपनीचे ?
मग सद्गृहस्थ म्हणाले  'अंबूजा सिमेंट ' .
मी आश्चर्याने विचारले वो टिव्ही पे ॲड आती है विराट स्ट्रेन्थ , छोटा हत्ती , अंबूजा सिंमेटकी दिवार टुटेगी नही भाई वो वाली अंबूजा सिमेंट  .
मग सदगृहस्थ खूष झाले म्हणाले हा वही अंबूजा सिंमेट . 
आय एम मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ अम्बूजा सिमेंट मिस्टर नरोत्तम सेकसारीया .
       नरोत्तमभाईंचा हा सरळसाधेपणा पाहून मी थक्कच झालो .
       आम्ही माणसांची पारख कपड्यावरून , त्याच्या गाडीकडे पाहून , त्याच्या घराकडे पाहून , त्याच्या राहणीमानावरून करतो व लगेच अनुमान काढतो . गरीब ,सामान्य परिस्थितीतला मित्र , नातेवाईक , पाहूणा असला की दुर्लक्ष करतो . खोटा दिखावा तर खूप करतो . जो मी आहे तसा न दाखवता खोटेपणाची झूल पांघरून मी बघा किती 
" स्टॅन्डर्ड " माणूस आहे उच्च रहाणीमानाचा उच्चभ्रू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो . पण जी माणसे खरी असतात ती वेगळी असतात .त्यानां दिखावा करायची कधी गरज पडत नाही कारण ती विराट स्ट्रेन्थ  असलेली भरभक्कम मजबुतीची अंबुजा सिमेंटसारखी असतात .
         मी व स्वातीने त्यांची सर्व पेंटीग्जची व्यवस्थित नीट पॅकिंग केली व त्यांच्या गाडीत ठेवली . पाचगणी वाईसारख्या छोट्या गावातून एक तरुण जोडपे फक्त पेंटींग्ज करून जगते व सर्वांनां चित्रातून आनंद देते हे ऐकून त्यांनी आमचे कौतुक केले . दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी खास जेवणाचे आमंत्रण दिले . आमच्यासाठी खास पर्सनल सेक्रेटरी गाडी घेऊन पाठवली . 
मेकर्स टॉवर्सच्याजवळ ती इमारत होती . कफ परेडसारख्या एरियात सर्वात महाग जागेतील ती संपूर्ण इमारतच त्यांच्या मालकीची होती . घरातच डायरेक्ट लिफ्ट होती . त्या घरात भारतातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या  सर्व मान्यवर चित्रकारांची चित्रे होती . ती सर्व चित्र आम्हाला त्यांनी फिरून दाखवली . घरात साधा सफेत कुर्ता पायजमा स्लीपर घातलेले नरोत्तमभाई मला खूप मोठी शिकवण देऊन गेले . 
माणसे साधी  दिसतात म्हणून दुर्लक्ष करायचे नाही . ते माणसे जशी असतील तशी स्विकारायची .त्यांची कपडे साधी असतात म्हणून किंवा त्यांचे राहणीमान पाहून त्यांनां कधीच दूर लोटू नये . सर्वांनां सन्मानाने वागवावे . 
त्यादिवशी त्यांनी आणखी पन्नास हजार रुपये स्वातीच्या हातात देत म्हणाले खूप आनंद झाला मला तुमची चित्रं पाहून , या आनंदाची किमंत म्हणून हे पैसे देत आहे . आम्ही अर्थात नकार दिला . मग म्हणाले ठिक आहे तुम्ही पैसे घेत नाही तर माझ्यासाठी एक मोठे चार फूट बाय सहाफुटाचे वेळ मिळाला की सुर्यफुलांचे पेंटींग करा . स्वातीने ते पेंटींग करून दिले अशी खरी माणसे त्यांचे खरे  " स्टॅन्डर्ड " दर्शवतात .
          तो दिवस आज पुन्हा आठवला .
आज अशीच एक वयस्कर साधी कपडे घातलेली मराठी व्यक्ती गॅलरीत आली होती . त्यांच्या तर हाताच्या शर्टची बटनेपण लावलेली नव्हती . 
पण आता मला शहाणपणाचा अनुभव होता . अनुभव खूप शिकवतो .
 मी लगेच उठून त्यांचे स्वागत केले . त्यानां सोबत घेऊन सर्व चित्रे दाखवली तर आम्ही वाईचे आहोत हे ऐकून खूष झाले . म्हणाले आहो आम्हीपण पूर्वी वाईचे होतो . गोखले , रास्ते यांच्या घरातले . वाईच्या महागणपती मंदिराचा मी ट्रस्टी आहे . मग हातात हात घेऊन सगळीकडे फिरले .भरपूर फोटो काढा म्हणाले . शेवटी सगळी चित्रे बघून एक सर्वात उत्तम चित्र त्यांनी पसंद केले मला हे चित्र खूप आवडले म्हणत बऱ्यापैकी घासाघीस करून म्हणाले अहो चित्रातले मला काय कळत नाही .आपला थोडा थोडा संग्रह करत असतो . 
      मग पैसे देण्याची वेळ आली तर म्हणाले मला गुगल पे ,ऑन लाईन पेमेंट काय कळत नाय वो . मग मी म्हणालो ATM ने पैसे दया ,तर म्हणाले अहो माझ्याकडे कार्डबिर्ड काहीच नाही . मी आपला साधा माणूस .मग सर्वात शेवटी चेकने पैसे देतो म्हणाले .ड्रायव्हरजवळ चेक पाठवून देतो तोपर्यंत पेंटिंग पॅक करून ठेवा आमचा निरोप घेऊन घेऊन बाहेर चालत हळूहळू निघून गेले .
पाच मिनिटांनी ड्रायव्हर चेक घेऊन आला . 
हातात एक व्हिजिटिंग कार्ड दिले . 
त्या कार्डावर लिहिले होते . 
पार्टनर - वामन हरी पेठे ज्वेलर्स .
ड्रायव्हरला म्हणालो पेंटींगची साईज जरा मोठी आहे , गाडीत बसेल का ?
तर म्हणाला का नाही बसणार ? लई मोठ्ठी BMW आणली आहे .

        समर्थ रामदासांनी सांगितलेच आहे की, 'वेष असावा बावळा। परि अंतरी नाना कळा। तुमचा रुबाबदार पोशाख लोकांच्या मनावर काही काळ छाप पाडू शकेल, पण तुमच्या अंगी काहीच कार्य- कौशल्य नसेल वर तुमचे रुबाबदार कपडे कवडीमोलाचे ठरतात. मात्र, तुमच्याकडे विविध कला असल्या तर तुमच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यांकडे कोणीही पाहणार नाही. तुमच्या कलांचेच कौतुक केले जाते व गोडवे गाईले जातील . गाडगेबाबांच्या अंगावर कायम फाटके कपडे असायचे, पण त्यांच्या कीर्तनाला असंख्य लोक जमायचे. रस्त्यावर एखादे सुंदर चित्र काढणारा फाटक्या कपड्यांत असला तरी लोक त्याच्याकडे पाहत नाहीत. त्याच्या चित्राची वाहवा करून त्याला बक्षिसी देतात. उघड्या अंगाने खेळ करणान्या डोंबाऱ्याचा खेळ पाहायलाही गर्दी होते. का? तर त्याच्या अंगी असलेल्या नाना कळा आपणांस मोहवतात.​

आता तर मी कपड्यावरून कधीच कोणाचे स्टॅन्डर्ड ठरवत नाही . पण अशा शाळेतील भारी स्टॅन्डर्डची एक भारी गोष्ट मी तुम्हाला नंतर नक्की निवांत झालो की सांगेन .

माझा मित्र म्हणाला ब्लेझर घातल्याचा नक्की फायदा होईल .मी म्हणालो चित्रकाराने , कलाकाराने सुटबुट घातला काय किंवा नाय .
चित्रातील रंग , आकार , मांडणी , अभिव्यक्ती बोलते . चांगल्या कामाला मरण नाही . तुम्ही कोणत्याही ग्राहकाला इंप्रेस करून फार टेंबा मिरवू नका तुमची कला तुमचे काम सर्व काही नजरेत सांगत असते .
        आज मुंबई आर्ट फेस्टीव्हलचा अखेरचा दिवस त्यात रविवार  त्यामुळे गॅलरीत तुफान गर्दी होती . हौसे , नवसे व गवसे सगळीच मंडळी होती त्यात आता मोबाईलमुळे चित्र बघण्यापेक्षा व्हिडीओ शुटींग करणे , चित्रांपुढे स्टाईलने उभे राहून फोटो काढणे , सेल्फी काढणे हेच उदयोग जास्त चालले होते .भरमसाठ गर्दी होती . 

पण जिथे खूप गर्दी असते तेथे दर्दी माणसे खूप कमी असतात .

       आज भोरवरून दूरचा प्रवास करून कलाशिक्षक व चित्रकार चंद्रकांत जाधव आले होते . सोलापुरातील प्रसिद्ध कलाकार सचीन खरात सहकुटूंब आले होते . काही दिवसांपूर्वीच त्यांची वाईला स्टुडीओला भेट झाली होती . आर्टबीट फौंडेशनचे संतोष पांचाळ , आर्किटेक्ट श्री .राजीव साठे , प्रा .संजय कुरवाडे सर नागपुरचे वयोवृद्ध चित्रकार रामटेकेसरांना घेऊन आले होते . आमची मैत्रिण योगिता राणे , मित्राचे भाऊ वसंत घोलप , चित्रकार मित्र दिनकर जाधव , चित्रकार उमाकांत कानडे , चित्रकार सुनील व स्नेहा जाधव [पुणे] . आमच्या संजीवन शाळेचे माजी विद्यार्थी अरुण साळी खास चित्र प्रदर्शन पाहायला खूप दूरचा प्रवास करून आले होते . आमचे कलासंग्राहक मित्र श्री . व सौ .नरेन्द्र कलापि खास दुपारचे लंच घेऊन आले . ते स्वातीला मुलीसमान मानतात . त्यांची मिसेस स्वातीवर आईच्या मायेची पाखरण करते . अशी माणसे खरीखुरी " स्टॅन्डर्ड " असतात . त्यांचे प्रेम त्यांच्या कृतीतून व्यक्त होते .बोलायचीच गरज पडत नाही .
         सुप्रसिद्ध सुलेखनकार व मित्र अच्युत पालवांची भेट झाली . खूप आठवणी जाग्या करून केली त्यासाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल .
अनुभवाने माणूस समृद्ध होत जातो .
        ईंडीया आर्ट फेअरच्या निमित्ताने एक अनुभव किंवा शिकवण नव्याने शिकलो . खूप माणसे आली प्रचंड गर्दी झाली तर प्रदर्शन सक्सेस होत नाही त्यासाठी समज असणारी , जाणकार , रसिक माणसे थोडीच म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच असतात . 

आणि तीच माणसे खरी " स्टॅन्डर्ड " असतात .

आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे .
जरूर भेट द्या🙏

व्हॅलीज ॲन्ड फ्लॉवर्स
नेहरु सेंटर आर्ट गॅलरी
वरळी , मुंबई .

✍️सुनील काळे [ चित्रकार]9423966486

दूरदेशीची मैत्री - इल्झे विगॅन्ड =Part 2

दूरदेशीची मैत्री - पार्ट 2 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝           24 नोव्हेंबरला मी वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केली . मग एक विचार आला की शासकीय सेवेत काम ...